Wednesday, November 16, 2016

Thursday, November 10, 2016

11:50 PM

Chimbori recipe in marathi चिंबोरी

पावसाळ्यात चहा आणि भजीची लज्जत काही औरच. पण ‌ही झाली संध्याकाळची पंगत. जेवणाचे ताटही खास पावसाळी पदार्थांनी सजायला हवंच. या मोसमात मत्स्यप्रेमींच्या तोंडाला पाणी आणते ती, चिंबोरी. खास पावसात तब्येतीत ताव मारल्या जाणाऱ्या या चिंबोरीचे प्रकार आणि त्या बनवण्याच्या पद्धतीत खूप विविधता आढळते. चिंबोरी अनेकदा घरीच करणं पसंत केलं जातं. कारण हॉटेलमध्ये अस्सल चवीची चिंबोरी मिळतेच असं नाही. पण चटकदार चिंबोरीचा पर्याय बदलापूर पश्चिमेला साई सागर रेस्टॉरंटमध्ये नक्की सापडेल.

चिंबोरी सूप, गावठी भरलेली चिंबोरी, तंदूर चिंबोरी, आगरी पद्धतीची चिंबोरी, खाडीची चिंबोरी, नदीची चिंबोरी, समुद्राची चिंबोरी... कित्येक प्रकार आणि त्याचे स्वादही. या चवींचा आस्वाद घेऊ तितका थोडा. गांधीनगरमधील बाजारपेठेजवळील साई-सागर गार्डन रेस्टॉरंटमधील या खास चिंबोरी स्पेशल ‌डिशचा आस्वाद तृप्त करतो.

  

चिंबोरी सूप Chimbori Soup

गावठी चिंबोरीच्या छोट्या नांग्या कुस्करून त्यांचा रस तयार केला जातो. त्यात चवीनुसार मीठ, मसाला टाकून हे सूप सर्व्ह केलं जातं. या सुपाचा चमचा तोंडात गेल्यावरच एक बाऊल आणखी घ्यावं, अशी इच्छा होते.

आगरी चिंबोरी (खाडीची) Aagari Chimbori  Khadichi

बदलापुरात आगरी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इतर ठिकाणांप्रमाणे इथेही आगरी पद्धतीच्या चिकन आणि मटनासारख्या पदार्थांची रेलचेल आहे. पण आगरी चिंबोरीची बातच न्यारी... कारण खाडीच्या पाण्यातील ही चिंबोरी आगरी मसाल्याने भरलेली असते. मोठ्या आकाराची असते. आगरी मसाल्याची चव वेगळीच असते. याच चवीतील चिंबोरी म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच.

गावठी चिंबोरी
(नदीची) Gavathi Chimbori Nadichi

आगरी समाजाप्रमाणे इथे मुंबई-ठाणे या भागातून आलेले इतर प्रांतातील चिंबोरीप्रेमींना नदीच्या पाण्याची भरलेली काळी गावठी चिंबोरी जास्त आवडतात. कोकणातील चाकरमान्यांसाठी तर चिंबोरी म्हणजे खूप काही. कोकण पट्ट्यात चिंबोरीत गोड्या मसाल्याबरोबर मालवणी तिखट मसाला आणि ओले खोबरं, असं मिश्रण वापरलं जातं. हाच मसाला गावठी चिंबोरीत असतो.

तंदुरी चिंबोरी (खाऱ्या पाण्याची) Tanduri chimbori Kharya panyachi

आतापर्यंत आपण तंदुरीमधील चिकन, मटणाचे प्रकार पाहिले. पण तंदुरी चिंबोरीचा पर्यायही येथे आहे. या ठिकाणी खाऱ्या पाण्यातील, वीतभर लांबीची चिंबोरी तंदुरी मसाला लावून चिकन तंदुरीप्रमाणे भट्टीत भाजली जाते. लालभडक तंदुरी चिंबोरी पाहून वा क्या बात है... असे उद्गार आपसूकच येतात.

इतर मांसाहारी पदार्थ

इतरही मांसाहारी पदार्थ चांगल्या चवीचे आहेत. प्रॉन्झ कुरकुरा, हे त्यातील एक. यामध्ये न सोललेली ही कोळंबी छान तळलेली असते. पुदीन्याच्या चटणीतील कोळंबी म्हणजे फ्रॉन्स मिंट सॉस. यासाठी लागणारी कोळंबी, नदीच्या पाण्यातील आणि तलावतील असतात. याच बरोबर पत्रानी पापलेट. तळलेले पापलेट केळीच्या पानावर सर्व्ह केले जाते. चिकन आणि मटणाचे अनेक पदार्थही इथे मिळतात.

शाकाहारी खवय्यांसाठी

येथे शाकाहारी पदार्थांची चवही छान आहे. शाकाहारीमध्ये स्टार्टरपासून मेन कोर्सपर्यंत सर्व पदार्थ आपल्याला मिळतात. विशेष म्हणजे ग्राहकाने सांगितलेली आगळीवेगळी रेसिपीही येथे बनवून दिली जाते, असे साई-सागर फॅमिली रेस्टॉरंटचे संचालक अरुण चव्हाण यांनी सांगितले.
11:46 PM

recipe for rakti mundi

रक्ती मुंडी : देशभरात भेजा फ्राय म्हणून मिळणारा प्रकार आणि कोल्हापुरात मिळणारी रक्ती मुंडी यात फरक आहे. पण अगदीच सांगायचं, तर मुंबईत ज्याला वजरी म्हणतात, तसाच काहीसा वेगळ्या पद्धतीचा हा प्रकार म्हणता येईल.

त्यासाठी बकऱ्याचं ताजं रक्त, दोन कप बकऱ्याच्या मुंडीचं मांस, कांदे, कोल्हापुरी मसाला, इतक्याच मोजक्या साहित्यावर ही रक्ती-मुंडी तयार होते.

 बकऱ्याचं रक्त ताजं असतानाच घ्यावं लागतं. नुसतं मीठ घालून ते रक्त गरम करावं लागतं. ही कृती करण्याआधी पाहून घेतली तर बरं. नाही तर किती तापवायचं याचं गणित न जमल्याने या पदार्थाचा खेळखंडोबा होऊ शकतो.

नुसत्या कांदा-मसाल्यावर मुंडींचं मटण शिजवायचं आणि दोन्ही एकत्र करून ही रक्ती मुंडी वाढली जाते. रक्ती मुंडी बनवणं म्हणजे मोठं संयमाचं काम. साधारणपणे चार ते पाच तास इतकाही वेळ रक्ती मुंडी बनवायला लागतो. कोल्हापुरातल्या मटणवाल्याला रक्तीमुंडीसाठी वेगळं मटण सांगितलं, तर तो बकऱ्याच्या मुंडीचे बारीक तुकडे करून स्वच्छ करून देतो. मग आधी रक्ती म्हणजे रक्त शिजवून घ्यायचं. नंतर त्यात मुंडीचं मटण शिजवून दोन्ही एकत्र करायचं.

अशी ही रक्ती मुंडी खवय्यांना चटक लावणारी असते.
Mundi recipes
11:41 PM

Mutton-kharda recipe मटण खर्डा

मटण खर्डा : हा प्रकार असाच खवय्याची जीभ चाळवणारा. एरव्ही कोल्हापुरी मटण हे तिखटच असतं. पण ते लालभडक रश्शाचं असतं. कोल्हापुरी मिरचीचा ठसका लागणारं मटणही असतं. पण खर्डा मटण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून बनवलं जातं. जसा कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवला जातो, तसंच बनवयाचं. फक्त त्यात लाल तिखटाऐवजी मिरचीचा खर्डा वापरला जातो.

mutton kharda recipe

kharda recipe

lal mirchi thecha recipe in marathi

maharashtrian thecha chutney

lasuni thecha recipe

thecha recipe by sanjeev kapoor

varhadi thecha recipe in marathi

varadi thecha recipe

peanut thecha recipe
11:38 PM

egg khandoli recipe खांडोळी





egg khandoli recipe

खांडोळी : या नावावरूनच या पदार्थाविषयी उगाच काय समोर येईल, याची धास्ती वाटेल. पण अंड्याच्या अनेक प्रकारांना मागे सारेल, असा हा टेस्टी पदार्थ आहे. आम्लेट पाव जसा कोणत्याही शहरात, कुठेही खाता येईल असा प्रकार आहे, तसं खांडोळीचं नाही. त्यासाठी कोल्हापूरला जायला हवं. अर्थात, तिथे कधी खाऊन येण्याची संधी मिळाली तर घरीही करून पाहता येईल.

हाफ फ्राय करण्यासाठी तव्यावर टाकलेल्या अंड्यावरच ब्रेडची स्लाइस दाबून धरायची. त्या ब्रेडच्या स्लाइसला मैदानात एखाद्या पैलवानाला लोळवावं, तसा तो ब्रेड लोळवायचा. चारही बाजूने अंड्याचं मिश्रण लागलेल्या या आम्लेट-पावाची तव्यातच खांडोळी करायची, म्हणजे त्याचे तुकडे करायचे. मग प्लेटमध्ये ती खांडोळी वर तिखट-मीठ, कच्चा कांदा खालून दिली जाते. अंड्याची ही खांडोळी मटणाच्या कोणत्याही डिशला मागे सारेल अशीच आहे.

खांडोळी साहित्य : अंडी, ब्रेड स्लाइसेस, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा बटर, पाव चमचा मिरपूड किंवा तिखट, मीठ चवीपुरते.

कृती : अंडी फोडून चांगली फेटून घ्यावी. त्यात मिरपूड भूरभुरावी. तव्यावर अंड्याचे बॅटर ओतून घट्ट व्हायच्या आत ब्रेड स्लाइस दाबा. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी ब्रेड चांगला भाजून घ्यावा. त्याला डिशमध्ये घेऊन चौकोनी कापून घ्यावे, कोथिंबीर घालून गरमागरम खाण्याची मजा काही और आहे. त्यात आणखी नावीन्य आणायचं असेल तर किसलेलं चीज घालून केचपसह खाता येते.

khandoli

khandoli recipe

khandoli dish

khandoli food

khandoli institute of technology giridih

khandoli agra

egg khandoli recipe

Friday, September 30, 2016

6:24 PM

एक एक मधमाशी जगवावया How to get Honey from Honey bee without killing them

shrikant gajabhiye
shrikant gajbhiye
एक एक मधमाशी जगवावया

'बी दि चेंज'द्वारे शेतकऱ्यांनाही मदतीचा प्रयत्न



राज्यात गेल्या दहा वर्षांत मधाचे उत्पन्न ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. बाजारात जे मध उपलब्ध आहे त्यात साखरेचे प्रमाण वाढते आहे. मधमाश्यांचे अस्तित्व हळुहळू संपुष्टात येत असल्याने, अस्सल मधाचा गोडवा कुठे चाखायला मिळणार! अशा परिस्थितीत निसर्गचक्र जपणारी, परागीकरणासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असणारी मधमाशी जपण्यासाठी २८ वर्षांचा एक तरुण 'बी दि चेंज' या प्रकल्पातून उभा महाराष्ट्र पिंजून काढतोय. पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनीही त्याचा हाकेला ओ देऊन मधमाशी जगवण्यासाठी शेत खुले केले आहे. मधमाशी जगवणारा हा तरुण आहे, श्रीकांत गजभिये...


आयआयएममधून एमबीएची पदवी घेतल्यानंतर नागपूरच्या श्रीकांतने कुतूहल म्हणून पुण्यात पाच दिवसांचा मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेतले. मधमाशीचे निसर्गचक्रातील अनन्यसाधारण महत्त्व या कोर्समुळे त्याच्यापुढे खुले झाले. ही मधमाशी संपली तर आंबे, कलिंगड, लिंबू, टरबूज, सिमला मिरची, कारले, जांभळासारखी अनेक फळे आणि साडेतीन हजारांहून अधिक फुलांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येईल, हे त्याच्या लक्षात आले. मधमाश्यांपासून मध गोळा करण्यासाठी मधमाश्यांची पोळी एकतर जाळून टाकली जातात किंवा मधमाशा मारून त्यापासून मध आणि मेण मिळवले जाते. पण हळुवार फुंकर मारून, अत्यंत कौशल्याने साखरी मोहळात राहणाऱ्या मधमाश्यांपासून मध मिळवता येते. या मधमाश्यांना लाकडी घरांमध्ये, बी हाऊसमध्ये राहण्याची सोय करता येते. हे या प्रशिक्षणातून लक्षात आल्यावर श्रीकांतला एकच ध्यास लागला. तो म्हणजे मधमाशी जगवण्याचा, त्याचा लाभ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा. त्यातूनच साकारला गेला 'बी दि चेंज' नावाचा प्रकल्प. पवनी येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालय, प्रा. भुवेंद्र राहिले, पुरुषोत्तम गेदाम यांनी त्यासाठी मोलाची साथ दिली.
6:02 PM

मध आणि लिंबू - Honey and Lime - Madh and Limbu



 कमाल लिंबाच्या शक्तीची


लिंबू आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. गरम पाण्यात थोडंसं लिंबू पिळून तयार होणारं लिंबूपाणीही तितकंच लाभदायक आहे. त्याविषयी...

पचन क्रियेला मदत

सकाळी उठल्यावर एखाद्या लिंबाचा रस कोमट पाण्यासह रिकाम्या पोटी प्यायल्यास आंत्र जठर प्रक्रियेला उत्तेजन मिळतं. ही क्रिया नियमित केल्यास पचन क्रिया सुधारते आणि हृदयातील जळजळही कमी होते.

यकृताचं निर्विषीकरण

लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड असतं. त्यामुळे यकृतातील प्रक्रिया सहज होण्यास मदत होते. तसंच यकृताचं निर्विषीकरण होण्यास उत्तेजन मिळतं.

पित्तासाठी गुणकारी


अनेकांना पित्ताचा त्रास होतो. पण लिंबू पाण्यामुळे पित्त कमी व्हायला मदत होते. लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड असल्याने त्यातील पौष्टिक घटक आणि खनिज ही अल्कलाइन प्रकारात मोडतात. सायट्रिक अॅसिड हे जास्त प्रभावी अॅसिड नसून ते शरीरातून वेगळं करणं सहज शक्य आहे. लिंबाचा रस शरीरात कॅल्शिअम कार्बोनेट हे प्रभावी अॅसिड तयार होण्यास विशेष उत्तेजना देतं. चीज किंवा मटणासारख्या पचनास जड अशा पदार्थांच्या पचनाच्या वेळी हे अॅसिड कामी येतं. तज्ज्ञांच्या मते पीएच लेव्हल सांभाळण्यास आणि लघवीच्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी लिंबाचा रस उपयोगी असतो.

रोग प्रतिकारक शक्ती वाढते

लिंबू असलेले सर्व पदार्थांमध्ये विटामिन सी (क जीवनसत्त्व) मोठ्या प्रमाणात आढळतं. हे विटामिन (जीवनसत्त्व) आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. लिंबामध्ये पोटॅशिअमही काही प्रमाणात आढळते. पोटॅशिअममुळे मेंदू आणि शरीराच्या चेता यंत्रणेला चालना मिळते. तर रक्तदाबही नियमित राहतो.

त्वचेसाठी उपयुक्त

तज्ज्ञांच्या मते लिंबातील व्हिटॅमिन सी (क जीवनसत्त्व) हे त्वचेसाठी अत्यंत चांगलं आहे. ते त्वचेत कोलाजेन तयार होण्यास मदत करते. यातील अॅन्टीऑक्सिडंट त्वचा पुनरुज्जीवित करतात आणि निरोगी ठेवतात. कोमट लिंबू पाण्यामुळे रक्तातलं टॉक्सीनचं प्रमाण कमी होतं. लिंबाचा रस त्वचेवरील डागांवर लावल्यास ते कमी होतात.

लिंबाच्या वापराचा अतिरेक करू नका. एका लिंबाच्या रसामुळे जर दोन किलो वजन कमी होण्यास मदत होत असेल तर चार लिंबाच्या रसाने अधिक वजन कमी होणार नाही, हे ध्यानात घ्या. लिंबामध्ये क्षार जास्त असल्याने त्याचं जास्त सेवन केल्यास, तुमच्या दातांना त्रास होऊ शकतो.

प्रत्येक वेळी लिंबू पाणी प्यायल्यावर साध्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. चूळ भरून टाका. यामुळे दातांना कोणताही त्रास होणार नाही.

लिंबू पाण्यात थोडंसं मध टाकून प्यायल्यास ते कफावरही गुणकारी ठरेल.

बाजारातून किंवा दुकानातून आणलेल्या लिंबू पाण्याच्या बाटलीतलं लिंबूपाणी कामाचं नाही. फक्त नैसर्गिक लिंबाचा रसच आरोग्याला चांगला असतो. 

================

 सुंदर त्वचेचं घरगुती रहस्य

रोजच्या दगदगीच्या आयुष्यात स्वतःच्या त्वचेची काळजी घेणं अगदी गरजेचं होऊन बसतं. त्यात रोजच्यारोज पार्लरला जाणं काही शक्य नसतं. शिवाय सतत कृत्रिम साधनांनी सौंदर्य वाढवणं हे फारसं चांगलंही नव्हेच. म्हणूनच आज काही 'होममेड फेसपॅक'बद्दल. आपला खिसा आणि त्वचा दोन्हीला आवडतील असे हे फेसपॅक करून बघाच.

मध : हातात फार कमी वेळ असेल तर हे मधाचं फेसपॅक तुमच्यासाठी अगदी योग्य ठरेल. चेहऱ्यावर एकसमान मध लावा आणि पंधरा मिनिटांनंतर एक कपडा पाण्यात बुडवून, पिळून चेहरा पुसून घ्या. जर त्या मधात तुम्ही सुकवलेल्या संत्राच्या सालांची पावडर करून घातलीत तर तुमची त्वचा आणखीनचं तुकतुकीत दिसेल.

चविष्ट पपईचं फेसपॅक : पपईचा पल्प घ्या, त्याला कुस्करा आणि त्यात दूध घाला. हळू-हळू सर्व मिश्रण ढवळा आणि त्याची पेस्ट करा. मग ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने तो फेसपॅक धुवा. आणि मग तुमच्या चेहऱ्यावर आलेलं तेज काही आगळंच असेल.

बदाम आणि दुधाचा फेसपॅक : तीन ते चार बदाम दुधात भिजत ठेवा. थोड्या वेळाने त्याची सालं काढून ते सर्व बदाम मिक्सरला लावा. त्या पावडरमध्ये हळू-हळू दूध घालून त्याची जाडसर पेस्ट बनवा. दुसरी पद्धत म्हणजे बदामाच्या तेलात मलई घालून त्याला चेहऱ्यावर लावा. दहा-पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. तेलकट त्वचा असलेल्यांनी हा फेसपॅक टाळावा.

चंदन-गुलाबपाणीचं फेसपॅक : चंदन आणि गुलाबपाणी यांची पेस्ट बनवा. प्रथम आपला चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तो एका कापडाने टिपून घ्या. चेहरा पूर्णतः कोरडा झाल्यावर त्यावर हा बनविलेला फेसपॅक लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होतो. तुम्ही उन्हातून, दगदगीतून घरी आल्यावर हा फेसपॅक नक्की लावा. तुमची त्वचा तर स्वच्छ होईलच पण त्या सोबत तुम्हाला थंडही वाटेल.

बेसन-दह्याचं फेसपॅक : तीन ते चार चमचे बेसन, तितक्याच प्रमाणात दही आणि त्यात दोन चमचे मध. या सर्व मिश्रणाची पातळ पेस्ट बनवा आणि ती चेह‍ऱ्यावर समप्रमाणात लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. जेणेकरून बेसन आणि दह्यामुळे त्वचा उजळून निघेल आणि मध तुमची त्वचा मॉईश्चराइज करेल.

तेलकट त्वचेसाठी फेसपॅक

मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणीः मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणी यांना एकमेकात मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ती आपल्या चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक तेलकट त्वचेसाठी सर्वात उत्तम ठरतो. बाजारात मुलतानी मिट्टी अगदी आरामात उपलब्ध होईल. आणि त्यात हा फेसपॅक बनवायला वेळही लागत नाही.

टॉमेटो, लिंबू आणि मधः एका वाटीत टॉमेटोचा बल्क घ्या, त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या. या सर्व मिश्रणाची पेस्ट बनवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. टॉमेटो आणि लिंबू तुमची त्वचा उजळवायला मदत करेल तर मध तुमच्या चेहऱ्यावर तजेला आणेल.

लिंबू आणि दुधः
एका वाटीत तीन चमचे दूध, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन छोटे चमचे हळद घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे चेह‍ऱ्यावरचा तेलकटपणा जाईल.

संत्र-लिंबू आणि मध‍ः
संत्र्याच्या सुकलेल्या सालींची मिक्सरला लावून पावडर बनवा; त्यात लिंबाचा रस आणि मध घाला. त्याची ढवळून जाडसर पेस्ट तयार करा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. जवळपास वीस मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा नीट धुवा. हा फेसपॅक तुम्हाला नक्कीच उत्तम परिणाम देईल.

काकडी आणि लिंबूः काकडीमुळे त्वचा तर उजळतेच. पण तुमच्या त्वचेवरचा टॅन घालवायलाही मदत करेल. काकडीचा एक चमचा रस एका वाटीत घ्या. त्यात एक चमचा मध आणि एक चमचा हळद घाला. या मिश्रणाची पेस्ट बनवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण डोळ्यांभोवती आवर्जून लावा कारण त्यामुळे डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ कमी होतात. पंधरा मिनिटांनी पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक तुम्ही रोज वापरल्यास तुम्हाला उत्तम परिणाम दिसेल.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. पण घरच्याघरी करता येतील, असेही काही उपाय आहेत. काही घरगुती फेसपॅकबद्दल...

लिंबू आणि कोरफड

लिंबाचा रस आणि कोरफडीच्या पानांचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने स्कीन टॅन कमी होतं.

दही आणि बेसन

दही आणि बेसनाचं मिश्रण चेह‍‍ऱ्यावर आणि हातांवर वगैरे लावावं. ते सुकल्यावर गरम पाण्याने धुवून टाकावं. त्यामुळे त्वचा मऊ आणि तेजस्वी होते.

चंदन आणि गुलाबपाणी

सनबर्नपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी हे उत्तम मिश्रण आहे. हा फेसपॅक लावल्याने ताजंतवानंही वाटेल.

मध आणि हळद

मध आणि हळदीचं मिश्रण करून लावल्यास त्वचेवर खूप चांगले परिणाम दिसतील. कारण हे एक उत्तम घरगुती मॉइश्चरायझर आहे.
=====================

थंडा मतलब...!


उन्हाळ्याच्या या दिवसांत आइस्क्रीम, मिल्कशेक्स, थंडपेय याची अगदी रेलचेल असते. रोजच्या रोज न चुकता आइस्क्रीम खाणारेही अनेक खवय्येही आहेत. दर उन्हाळ्यात कोणती ना कोणती नवी चव आपल्या जिभेला खुणावत असते. यंदा कोणत्या नवनव्या चवी आणि स्वाद बाजारात आलेत त्यावर एक नजर...

मिल्कशेकचा पहिला घोट, सरबताचा पहिला थेंब आणि जिभेवर एंट्री घेताक्षणी गारेगार करून टाकणारं आइस्क्रीम.... डोक्यावरचं ऊनही बघता बघता या थंडगार चवीत विरघळून जातं. यंदाच्या उन्हाळ्यात या थंडाव्याला कोणते स्वाद मिळालेत त्याची एक झलक...

रंग शरबतोंका..

उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी सगळ्यात सोप्पा मार्ग ‌म्हणजे सरबतं. कैरी पन्हं, ताक, लिंबू सरबत, लस्सी अशा देशी सरबतांबरोबरच यंदा ब‍‍ऱ्याच परदेशी पाहुण्यांनी या शरबती विश्वात प्रवेश केला आहे. मोयितो, फ्रुट पंच, स्मुदीसारखी सरबतं यंदा बाजारात दिसून येतायत.

मोयितोची जादू

मोयितो हे एक स्पॅनिश पद्धतीचं सरबत आहे. यात व्हाईट रम असते. आपल्याकडे मात्र क्लब सोडा घालून मोयितो बनवतात. पुदिना, आंबा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, लिची, संत्र अशा ब‍ऱ्याच स्वादांमध्ये मोयितो उपलब्ध आहेत. घरच्या घरीही तुम्ही हे मोयितो बनवू शकता.

साहित्य - १० ते १२ पुदिन्याची पाने, ४ ते ५ क्लब सोडा, ५ चमचे लिंबाचा रस, ५ ते ६ चमचे बर्फाचा क्रश, १ चमचा जलजीरा, अर्धा चमचा आलं, ५ चमचे साखरेचा पाक, पाणी आणि मध थोडंसं उकळून घ्या. मिश्रण घट्ट होत असताना पाक झाला असं समजावं.

कृती - एका ग्लासामध्ये पुदिन्याची पानं, क्लब सोडा, जलजीरा, साखरेचा पाक, लिंबाचा रस, आलं एकत्र करून घ्या. हे सगळं लाकडी चमच्याने ठेचून घ्यावं. ते करताना पुदिन्याची पानं खूप वाटली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सरतेशेवटी यात बर्फाचा चुरा आणि पाणी घालावं. लिंबाच्या चकत्या आणि पुदिन्याची पानं लावून सजवावं.

आइस्क्रीमची ओढ

उन्हाळा आणि आइस्क्रीम हे एक अतूट नातं. सध्या मात्र आइस्क्रीमच्या चवीमध्ये अनेक नवनवे स्वाद आलेले दिसतात. आंबा, व्हॅनिला, चॉकलेट, पिस्ता बदाम अशा नेहमीच्या चवींखेरीज मसाला पान, गुलकंद, मिरचीपर्यंत निरनिराळ्या चवीची आइस्क्रीम चाखायला मिळतील. यासोबतच थंडाई, राजभोग, गुलकंद असे स्वाद आहेत. तर फळांमध्ये आंब्याव्यतिरीक्त चिकू, नारळ, कलिंगड, पपई, सीताफळ, लिची, अननस, अंजीर, फणस, जांभूळ, कच्ची कैरी, टरबूजापर्यंत अनेक निरनिराळ्या चवी आपल्या जिभेच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. यासोबतच तीन चार फ्लेवर्स एकत्र करून दिलं जाणारं गडबड आइस्क्रीम, किंवा दह्याचं बनलेलं योगर्ट आइस्क्रीम खाणा‍ऱ्यांची संख्याही कमी नाही.

मिल्कशेकची जादू

आइस्क्रीमनंतर नंबर लागतो तो मिल्कशेकचा. घरातून बराच काळ बाहेर असताना कधीकधी भूकही लागते आणि तहानही. हे दोन्ही भागवणारा हुकुमी एक्का म्हणजे ‌मिल्कशेक. इतर वेळी दुधाला नाकं मुरडणारी मंडळी तेच दूध मिल्कशेकच्या रुपात आल्यावर मात्र अगदी आवडीने गट्टंम करतात. मिल्कशेकमध्येही आता एकदम भन्नाट स्वाद येऊ लागलेत. बडीशेप, कॉफी, स्ट्रॉबेरी, किवी विथ स्ट्रॉबेरी, मिल्कशेक विथ क्रश्ड क्रीम अशा निरनिराळ्या हटके प्रकारांची चलती आहे. सोबतच रबडी, बासुंदी, बनाना मिल्क, अंजीर, रासबेरी, ड्रायफ्रुट बेस मिल्कशेकसारख्या जुन्या प्रकारांनाही खवय्यांची पसंती आहेच. आइस्क्रीम आणि चॉकलेट बेस मिल्कशेकसुद्धा आहेतच. आइस्क्रीम किंवा चॉकलेट बेस्ड मिल्कशेकमध्ये आंब्याचे तुकडे किंवा आंब्याच्या रसाचा कल्पक वापर करून निरनिराळे मिल्कशेकचे प्रकार बनवले जात आहेत. याशिवाय दोन वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक एकत्र करून तयार केले जाणारा फ्युजन मिल्कशेकही खवय्यांची पसंती मिळवत आहेत.

रसायन

रसायन हा थोडा वेगळा प्रकार आहे. अगदी ३०-३५रुपयांपासून ते ४००रु. पर्यंत किंमतीत तो तुम्हाला मिळू शकतो. दक्षिण मुंबईमध्ये तर तो खूप जास्त लोकप्रिय आहे. या प्रकारात केळ हे मुख्य फळ आणि सोबत इतर ४-५प्रकारची फळं घातलेली असतात. रस्त्यावरच्या गाडीपासून ते चकाचक मॉलपर्यंत ब‍ऱ्याच ठिकाणी हा पदार्थ चाखायला मिळू शकतो.

आइस्क्रीम केक

वॉलनट ब्राऊनी बरोबर व्हॅनिला आइस्क्रीम अनेकांनी खाल्लं असेल. पण या उन्हाळ्यात वेगवगेळ्या स्वादाच्या केकबरोबर वेगवेगळी आइस्क्रीम्स चाखणा-यांची संख्या वाढल्याने विक्रेत्यांनी आइस्क्रीम केक हा नवीन प्रकार उपलब्ध करुन दिला आहे.


 लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण पावसाच्या धारा अंगावर घेण्यासाठी आतुर असतात. पावसाने हजेरी लावली की सगळ्यांच्या आनंदाला उधानच येतो. या पावसात भिजल्यानंतर कितीही मज्जा आली तरी नंतर काही आजार होण्याची भिती असते, त्यामुळे चला पाहूयात अशा आजारांपासून बचाव करण्याचे काही घरगुती उपाय ...

 आलं- एक आल्याचा तूकडा घेऊन तो पाण्यात उकळा त्यात लिंबू आणि मध घालून प्या.

 मध- मध हे 'अॅन्टीऑक्सीडंट'ने परिपूर्ण असते. कफ झाला असल्यास किंवा घसा दूखत असल्यास एक चमचा मध आणि लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास आराम मिळतो.

कडूलिंब
व्हायरल इनफेक्शन झाल्यास कडूलिंबाची १०-१२ पाने उकळून घ्या आणि दिवसातून २-३ वेळा याचे सेवन केल्यास तुमची इम्यूनीटी पॉवर वाढण्यास मदत होईल.

============

आरशात बघायला आवडत नाही, अशी ना मुलगी आढळेल ना स्त्री. आपले सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी 'सजना हैं मुझे'ची ओढ प्रत्येकीलाच असते. केसांची निगा राखण्यासाठी रोज मसाज करणे, तसेच हिरव्या पालेभाज्या खाणे, केसांच्या मुळांना तेलाची मालिश करणे असे विविध उपाय सुचविले. केस धुताना हर्बल शाम्पू, आवळा किंवा शिकेकाई यांचा वापर करावा.


त्वचेची घ्या रोज काळजी

कोरडी, तेलकट आणि सामान्य त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी डवरे यांनी विविध उपाय सांगितले. तेलकट त्वचा असल्यास मुरूम येण्याचा धोका असतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दिवसातून तीन ते चार वेळा आपला चेहरा धुवावा, अशी सूचना त्यांनी केली. चेहरा साफ करण्यासाठी दही, ताक, मध किंवा साखर अशा पदार्थांचा वापर करावा. ब्लिचिंग करण्यासाठी मसूर डाळ, मध आणि टोमॅटो ज्यूस यांचे मिश्रण वापरावे, असे हर्बल उपायदेखील त्यांनी सुचविले. या कार्यशाळेला नागपूरकर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



टिप्स सौंदर्याच्या

केसातील कोंडा घालविण्यासाठी वापरा मध आणि लिंबू किंवा दही.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा स्टीमचा वापर.

जास्त तेलकट खाऊ नका.

मेकअप करण्यापूर्वी वापरा मॉइश्चरायजर आणि मेकअप काढण्यासाठी क्लिन्सिंग मिल्क.

घराबाहेर पडण्याच्या १५ मिनिटे अगोदर लावा सनस्क्रीम लोशन.

तेलकट त्वचेसाठी वापरा वॉटरप्रूफ मॉइस्चरायजर 

==========
थंडीच्या दिवसात महागडी सौंदर्य उत्पादनं वापरण्यापेक्षा काही सोप्या गोष्टी करूनही त्वचेची काळजी घेता येते.

१) चणाडाळ, उडीद डाळ, मसूर डाळी यांचं पीठ एकत्र करून त्यात पाणी आणि खडे मीठ घालून ते विरघळवून लावावं. यात साध्या पाण्याऐवजी दह्याचं पाणीही वापरता येईल.


२) ज्यांची त्वचा मुळातच कोरडी आहे, त्यांची त्वचा थंडीमध्ये जास्त सुरकुतलेली दिसते. अशांनी मध आणि लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रसानं स्क्रब करावं.

३) थंडीमुळे कडक गरम पाण्यानं आंघोळ करण्याची सवय अनेकांना असते. मात्र, त्यामुळे चेहऱ्यावरील उघड्या छिद्रांना हानी पोहोचून नवीनच समस्या उद्भवू शकते. सर्दी झाल्यावर वाफ घेतानाही ती अतिप्रमाणत घेतल्यास अशीच अडचण होते. यासाठी पाणी खूप कडक असू नये.

४) खोबरेल तेल, अॅरोमा किंवा तिळाच्या तेलानं मसाज करून आंघोळ करणं हा उपाय सर्वोत्तम आहे. तेवढा वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलंही तेल थोड्या प्रमाणात घालावं. म्हणजे त्वचेचं आपोआप मॉइश्चरायझिंग होतं.

५) रात्री बदाम भिजवून, सकाळी त्याची सालं काढून, पेस्ट करून ती संत्र्याच्या रसात मिक्स करून लावावी.

६) आंघोळीआधी त्वचेला पंचामृत लावल्यानंही त्वचेला मॉइश्चर मिळतं.
3:24 PM

पाणी पिण्याचे फायदे

नियमित कोमट पाणी प्यायल्याने होतात हे 8 आश्चर्यकारक फायदे...

पाणी पिण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील. परंतु तुम्हाला कोमट पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत का... जर माहित नसतील तर आम्ही सांगतो. कोमट पाणी हे एका औषधी प्रमाणे आहे. नियमित कोमट पाण्याचे सेवन हे फक्त तुम्हाला निरोगी ठेवत नाही तर आरोग्यासंबंधीत अनेक समस्या दूर करते. चला तर मग जाणुन घेऊया कोमट पाणी पिण्याच्या फायद्यांविषयी...

1. त्वचे संबंधीत समस्या दूर
जर तुम्ही त्वचे संबंधीत समस्यांने त्रस्त असाल आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी विविध ब्यूटी प्रोडक्ट्स वापरुन देखील काहीच फरक पडत नसेल. तर नियमित एक ग्लास कोमट पाणी पिने सुरु करा. तुमच्या स्किन संबंधीत सर्व समस्या दूर होतील आणि स्किन ग्लो करेल.

2. मासिक धर्मासंबंधीत समस्या
तरुणींना जर पीरियड्सच्या काळात पोट दुखी होत असेल तर एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने आराम मिळतो. खरेतर या काळात होणा-या वेदना मासपेश्यां ताणल्या गेल्यामुळे होतो. जर आपण गरम पाणी पिले तर त्यांना आराम मिळतो.


3. किडनी निरोगी राहते
गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ यूरीनच्या रस्त्याने बाहेर निघून जातात. यामुळे किडनीवर कमी दबाव पडतो आणि किडनी निरोगी राहते. प्रयत्न करा की, दिवसातुन दोन वेळा कोमट पाणी पिता येईल.


4. भूक वाढते
ज्या लोकांना भूक न लागण्याची समस्या आहे त्यांनी रोज सकाळी एक ग्लास पाणी प्यायले पाहिजे. असे नियमित केल्याने त्यांना फायदा होईल.


5. पोटाच्या समस्या दूर होतात
गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. दिवसातुन दोन वेळा गरम पाणी प्यायल्याने तुम्ही पोटाच्या समस्यांपासुन दूर राहू शकता. सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातुन सर्व विषारी तत्त्व बाहेर निघतात, ज्यामुळे पुर्ण सिस्टम स्वच्छ होते.


6. संधीवात
संधीवात असणा-या लोकांनी गरम पाणी पिणे एखाद्या औषधी प्रमाणे आहे. नियमित कोमट पाण्याचे सेवन करणे हे जॉइंटमध्ये लवचिकता आणते, ज्यामुळे संधीवाताची समस्या कमी होते.


7. वजन कमी करते
वजन कमी करण्यात देखील गरम पाणी मदत करते. जेवणाच्या एक तासानंतर गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते. जर कोमट पाण्यात लिंबू आणि मधाचे काही थेंब मिळवून प्यायले तर बॉडी स्लिम होते.


8. इम्यूनिटी वाढते
एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू मिळवून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमीन सी मिळते. गरम पाणी लिंबूचे कॉम्बिनेशन शरीराच्या इम्यूनिटीला मजबूत करते.
3:18 PM

बद्धकोष्ठ - पोट साफ होण्यासाठी काय करावे




दिवसातून एकदा नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.

आहारातील पदार्थांचे प्रकार व प्रमाण
पोट साफ होण्यासाठी त्यात पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. काही पदार्थ जात्याच रुक्ष असतात व पोटात मैदा, मिठाई, बेसन, इ. पदार्थांनी पोट लवकर साफ होत नाही.
आपल्या शरीराला लावलेली सवय व दिनचर्या पोट साफ होणे-न होण्याला कारणीभूत ठरते.
-  बध्दकोष्ठ हा बहुधा चुकीच्या आहार-विहार सवयींचा परिणाम असतो.
-  रुक्ष आहाराने (उदा. फरसाण, चणे, चुरमुरे, फुटाणे) तात्पुरते बध्दकोष्ठ होते.
-  उतारवयात गुदद्वाराच्या कर्करोगाची शक्यता मनात ठेवून एकदा तरी तपासणी केली पाहिजे.
-  कॉफी जास्त पिण्याने आतडी मंदावतात व बध्दकोष्ठ होते.
-  तंबाखूच्या सेवनानेही बध्दकोष्ठता होते.
-  बध्दकोष्ठामुळे मळ कोरडा होऊन खडे तयार होतात यामुळे मळ बाहेर पडायला अवघड जाते.
-  पोटाच्या डाव्या बाजूला हाताने दाबून आपल्याला मोठया आतडयाचा भरीव घट्ट-कडकपणा जाणवतो.


उपचार
         लहान मुलांना बध्दकोष्ठ असेल तर एक सोपा उपाय करा.
एक-दोन चमचे तेलकट किंवा बुळबुळीत पदार्थ (उदा. गोडेतेल) गुदद्वारात भरल्यास आतले  मळाचे खडे 10-15 मिनिटांत बाहेर पडतात व दुखत नाही. यासाठी एरंडेल तेल, पॅराफिन (एक प्रकारचे पातळ मेण) किंवा साबणाचे पाणी वापरतात. हे फक्त एक-दोन चमचेच वापरायचे असल्याने हा एनिमा  नाही. (एनिमामध्ये पावशेर, अर्धा लिटर साबणाचे पाणी वापरतात.) मुलांना एनिमा देऊ नये.
पॅराफिनच्या लांबट गोळया मिळतात. वेष्टन काढून ही गोळी गुदद्वारात सारली की  थोडया वेळाने विष्ठा सैल होऊन सरकते.


बध्दकोष्ठाचा त्रास अनेक जणांना होतो. उपायही अनेक आहेत.
-  मळाचे कोरडे खडे झाले असल्यास ते बाहेर पडण्यासाठी तोंडातून औषध देण्यापेक्षा गुदद्वारामार्फत उपाय करणे चांगले. यासाठी जुन्या मऊ सुती कापडाची सुरळी (करंगळीइतकी जाड) करून एरंडेल तेलात भिजवून गुदद्वारातून आत सरकवावी. रुग्णास स्वत:सही ही क्रिया जमू शकेल. यानंतर तीन-चार तास पडून राहण्यास सांगावे (किंवा हा उपाय झोपताना करण्यास सांगावे). यामुळे कोरडे खडे तेलकट होऊन बाहेर पडणे शक्य होते. लहान मुलांसाठी आणि वृध्दांसाठी हा उपाय फार चांगला ठरतो. याऐवजी तेलाची पिचकारीही चालेल.
-  बध्दकोष्ठासाठी पोटातून उपाय करायचा असल्यास 15 ते 40 मि.ली. शेंगदाणा तेल  रात्री प्यायला द्यावे. त्यापाठोपाठ गरम पाणी किंवा चहा द्यावा म्हणजे जिभेवर तेलकट चव राहणार नाही. या उपायानेही खडे सुटतात.
-  सौम्य विरेचनासाठी त्रिफळा चूर्ण अर्धा ते दीड चमचा + एक कप गरम पाणी रात्री झोपताना द्यावे. त्रिफळा चूर्ण वारंवार घ्यायची वेळ आल्यास दर वेळेस 4-5 चमचे तेल किंवा तूप या बरोबर घ्यावे.
-  ज्यांना वारंवार मळाचे खडे होतात त्यांनी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.  फुटाणे, टोस्ट, फरसाण, पापडीशेव, पिठले, डाळमोठ, चिवडा, इत्यादी मूलत: कोरडे असणारे पदार्थ वर्ज्य करावेत. याऐवजी पालेभाज्या, मूग, मटकी, चवळी, इत्यादी चोथा-सालपटयुक्त पदार्थ घेणे चांगले.
-  जागरण करणे किंवा उशिरा झोपून उशिरा उठणे, हेही खडे होण्याचे कारण आहे. पहाटे उठून मलविसर्जन करणा-यास हा त्रास सहसा होत नाही.


होमिओपथी निवड
ब्रायोनिया, सीना, फेरम फॉस, लायकोपोडियम, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सिलिशिया



संडास साफ होण्यासाठी उपाय

पोट साफ होण्यासाठी काय करावे

संडास साफ न होणे

पोट साफ न होणे घरगुती उपाय

बद्धकोष्ठता उपाय

पोटाचे विकार


संडास साफ न होणे

पोट साफ न होणे

पोटाचे विकार

पोट दुखणे उपाय


3:12 PM

Pot Kami Karne Upay in Marathi

 ७ दिवसात आत जाऊ शकते पोट करा लठ्ठपणा दूर


pot kami karnyasathi upay marathi


लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे+छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे 7 दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल....

१. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

२. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

३. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

४. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

५. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

७. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.

७. जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.

८. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.

९. दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नयेत.

१०. सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.

११. दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील वसा कमी होण्यास मदत होते.


=============
* व्यायाम  करणे, २४ x ७ आनंददायी  राहणे
* खरी भूक लागल्यावर आणि प्रसन्न चित्ताने, सावकाश खाणे.
* पोट भरावयाच्या आधी पूर्णविराम घेणे.

जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.

पोटाचा घेर किती असावा?
यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!

आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.

पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! मी स्वत: सुद्धा २०११ मध्ये धोक्याच्या पातळीवर होतो. माझ्या पोटाचा घेर ९६ सेंमी (३८ इंच) होता. आज मात्र मी तो ८६ सें.मी.वर (३४ इंच) आणला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांची ही स्थिती आहे, तर इतरांबाबत काय बोलणार? खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते. मग नेमके करावे तरी काय?

प्रयत्नांची दिशा –
पोटाचा घेर कमी करावयाचा म्हणजे ‘गुलाबजामच्या थोबडीत मारणार आणि जिलेबी कधीच खाणार नाही!’, अशी दिशा बरेच जण निवडतात. यात ९९ टक्के भर काय खायचे व काय खायचे नाही यावर असतो. ही दिशाच मुळी चुकीची आहे. दिशाच चुकीची असेल तर उद्दिष्ट गाठणे कसे शक्य होणार? त्यामुळे ९९ टक्के भर केव्हा, काय, कसे व किती यावर हवा!

पोटाचा घेर वाढलेल्या व्यक्तीची मानसिकता –
‘मी आता असाच- ढेरीसकट मरणार’, ‘आता माझ्या पोटाच्या घेरात फरक पडणार नाही’ अशी नकारात्मक भावनाच सर्वसाधारणपणे आढळून येते. २०११ पर्यंत माझी मनस्थिती सुद्धा अशीच होती! वेगवेगळ्या पद्धती अवलंबूनही काहीच फरक न पडल्यामुळे ढेरी वाढलेल्या व्यक्ती हताश, निराश झालेल्या असतात. त्यात बऱ्याच जणांनी लाखभर रुपये खर्चही केलेला असतो. त्यामुळे त्यांचा स्वत:वरचा व अशा प्रकाराची सेवा देणाऱ्यांवरचाही विश्वास उडालेला असतो. त्यात भरीस भर म्हणून या व्यक्तींकडे वेळेचा अभाव असतो. व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही सर्वाचीच बोंब! पूर्वी ज्याला व्यायामाला वेळ नाही त्याची ‘वेळ’ जवळ आली आहे’, असे म्हणत असत! आता मात्र या वाक्याचाही काही उपयोग नसल्याचे दिसते.

आता पोटाचा घेर कमी करण्याचे सार पाहू
 
या – व्यायाम + दररोज  १२ सूर्यनमस्कार + आनंददायी २४x७!

खरी भूक लागल्यावर हवे ते-
(याला काही पदार्थ नक्कीच अपवाद आहेत.) प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे!..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट भरावयाच्या आधी थांबावे!

व्यायाम + आनंददायी २४x७  :
यात वयाच्या पस्तिशीपर्यंत आपण कधीच आणि काहीच व्यायाम केला नसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामास सुरुवात करणे इष्ट. व्यायामात १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हालचाल करीत राहा. बसून राहण्याऐवजी उभे राहा, उभे राहण्याऐवजी चालणे शक्य असेल तेव्हा तेव्हा चाला. नेहमीची, जवळच्या अंतरावरची कामे करण्यासाठी चालत जा, सायकल असेल तर ती वापरायला काढा. या हालचालींमुळे आपोआप व्यायाम होत राहील. जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा.

खरी भूक लागल्यावर :
खरी भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. ‘हवे ते खा’ म्हणजे नेमके काय?-  शिजवलेले अन्न (रोजचे जेवण) दिवसांतून दोन वेळा. एरवी दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा. हातसडीचा तांदूळ वापरणे फारच चांगले. घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे ऑडिट करा. (पूर्ण दिवसात माणशी २० मिली तेलाचा वापर योग्य.) जे काही खाल ते प्रसन्न चित्ताने आणि सावकाश खा. काहीही खाताना, पिताना आधी व्यवस्थित खाली बसा, शांतपणे, प्रसन्न मनाने, सावकाश, पंचेद्रियांनी अन्नाचा आस्वाद घेत खा. जेवणासाठी २०-३० मिनिटे वेळ ठेवा. घाई गडबड टाळा.

पोट भरावयाच्या आधी पूर्णविराम:
एखादा आवडता पदार्थ जेवणात असला, तर पोटात अजून थोडी जागा असतानाच जेवणाला पूर्णविराम देणे जड जाईल. पण हळूहळू हे नक्की जमेल. शक्यतो परत वाढून घेऊ नका म्हणजे याची सवय होत जाईल. पोट भरण्याचा सिग्नल मिळण्यास थोडा वेळ लागतो, हे ध्यानात    ठेवा.
ठरवल्या तर वरील सर्व गोष्टी सहजपणे करता येतात. वर्षभरात व्यक्तीला साधारणपणे ४ ते ५ इंच पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा! पोटाचा घेर नक्की कमी होऊन आपले आरोग्य हमखास सुधारेल!



सुटलेलं पोट कमी करण्यासाठी प्रभावी ५ योगासनं potache vyayam in marathi

vajan kami karne marathi tips

वजन कमी करण्याठी योग हा सर्वात महत्वाचा आणि साधा उपाय मानला जातो, योगमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो, गर्भवती महिलांना देखिल काही गोष्टीत काळजी घेऊन योग करण्याचा सल्ला दिला जातो.

तणावामुळे माणसामागे अनेक रोग लागतात. योग केल्याने वजन घटते. तुम्ही फिट राहतात आणि तुमचा आत्मविश्वास देखिल वाढतो.

तणावामुळे अनेक आजार वाढतात, मात्र योगाच्या माध्यमातून यातून निश्चितच फायदा होतो. आजारपण दूर ठेवता येतं. खाली काही आसनं देण्यात आली आहेत. ज्यामुळे नेहमीच वजन कमी करण्यात मदत होत असते.

वक्रासन

पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा व शरीराच्या जवळच उभे करा व दोन्ही पायांमध्ये खांद्याएवढे अंतर ठेवा.

दोन्ही हात उचलून तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याच्या व उजवा हात उजव्या खांद्याखाली सरकवा.

श्‍वास घेत घेत हळुवार खांदे वर उचला. मान सैल सोडा, हात कोपरात व पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत कंबर वर उचला. श्‍वसन संथ चालू ठेवा.

फायदे
आपण व्यवहारात नेहमी पुढे वाकत असतो. त्यामुळे पाठीचा कणाही नेहमी पुढच्या दिशेने अधिकाधिक वाकविला जातो. त्याच्या अगदी नेमकी उलट अवस्था या आसनात होते. त्यामुळे पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढायला या आसनाचा निश्‍चित उपयोग होतो. पोटाचे, मांड्यांचे, पोटर्‍यांचे स्नायू कार्यक्षम होतात.

दक्षता
पाठीच्या कण्याचे विकार असणार्‍या रुग्णांनी हे आसन मार्गदर्शनाशिवाय करू नये.
********
भुजंगासन
जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा. पायाची बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा.

दोन्ही पाय जुळवून घ्यावेत, तुमची दोन्ही पाउले आणि टाचा एकमेकाला हळूवारपणे स्पर्श होतील याची खात्री करून घ्या..

हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्या. हाताची कोपरं शरीराला लागून व समांतर असावेत.

एक दिर्घ श्वास घेऊन हळूवारपणे डोके, छाती व पोट वर उचला, पण तुमची नाभी जमिनीवरच असू द्यात.

आता, हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा.
लक्षात ठेवा: तुमच्या दोन्ही तळहातांवर सारखेच वजन असू द्यात
पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत, सजग राहून श्वास घेत राहा. जास्तीतजास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा. आता डोके मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असे पहा.

लक्षात ठेवा: तुमचे कान तुमच्या खांद्यांपासून दूर आहेत का? खांद्यांना आराम द्या. हाताची कोपरं थोडे वाकवले तरी चालतील. सरावाने तुम्हाला कोपरं सरळ ठेऊन आसनस्थिती सुधारता येईल.

तुमचे पाय अजूनही जुळलेले आहेत ना याची खात्री करा. चेहऱ्यावर स्मित कायम ठेवत श्वास घेत राहा.

आसनस्थितीत प्रमाणाबाहेर जास्त वेळ राहू नका व सहन होईल एवढाच ताण द्या.
श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.

भुजंगासनाचे फायदे

खांदा व मानेला मोकळे करते.
पोट पुष्ट करते.
संपूर्ण पाठ व खांदे सशक्त बनवते.
पाठीच्या मधल्या व वरील भागांना लवचिक बनवते.
छाती विस्तारते.
रक्ताभिसरण सुधारते.
थकवा व तणाव कमी करते.
श्वसनमार्गाचे विकार जसे दमा असलेल्या लोकांना फारच उपयुक्त. (परंतू खोकल्याची उबळ आली असता हे आसन करू नये).
भुजंगासन केंव्हा करू नये

गरोदरपणात, छातीचे अथवा मनगटाचे हाड मोडल्यास, किंवा नुकतीच एखादी पोटाची शस्त्रक्रिया, जशी हर्निया, झाली असल्यास हे आसन करू नये
तुम्हाला कार्पेल टनेल सिंड्रोमचा त्रास होत असेल तर भुजंगासन करू नका.
जुन्या आजारात किंवा पाठीच्या कण्याच्या विकारात हे आसन फक्त श्री श्री योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.
**********
धनुरासन
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात.
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात. पाठीला किंवा कण्याला गंभीर विकार झाले असतील तर हे आसन करू नये. अल्सर, कोलायटीससारखे पोटांचे विकार असलेल्यांनी हे आसन टाळावं. छातीवर झोपावं.

दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावेत आणि सहा ते सात इंच एकमेकांपासून दूर करावेत.
दोन्ही हातांनी पायाच्या घोटयाजवळ पकडावं.
आता श्वास घ्यावा आणि हातांनी पाय व पायांनी हात ओढून वर उचला. संपूर्ण शरीर वर उचला आणि ताणलं जाऊ द्या.
पाय वर उचलताना पोटऱ्या मांडयापासून लांब नेण्याचा प्रयत्न करा. शरीराची आकृती ताणलेल्या धनुष्यासारखी होईल.
अशा स्थितीत किमान १० ते ३० सेकंद राहा. श्वास संथगतीने सुरू राहू द्या.
या स्थितीत असताना हाताची पकड जास्तीत जास्त वर घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच शरीराचा सगळा भार पोटावर येईल.
पूर्वावस्थेत येताना, श्वास सोडत सोडत, गुडघे, खांदे, हनुवटी हळूहळू जमिनीवर टेकवा.

गुडघ्यात पाय हळूहळू सरळ करा, गुडघे सरळ केल्यावर पूर्वस्थितीला या. थोडया वेळ शरीर शिथिल करा.
फायदा
या आसनामुळे शरीराचे स्नायू दृढ आणि लवचिक होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोट, पाठ, मान, छाती, हात, पाय यांसारख्या अवयवांना एकचवेळी उत्तम आणि योग्य ताणाची स्थिती मिळाल्याने, शरीराला होणारा लाभ वृद्धिंगत होतो. तसंच पाठीचा वक्रदोष नष्ट होतो. कमरेची आणि मानेची दुखणी कमी होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटांचे स्नायू खेचले गेल्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते. तसंच पाठीचा मणका विशेषत: कुठल्याही दिनचर्येच्या कामात धनुष्याप्रमाणे असा ताणला जात नाही, तो या आसनामुळे ताणला जातो. म्हणून मणक्याची गादी सरकणं, मणके झिजणं आणि कमरेचे स्नायू जखडणं या व्याधींवर अत्यंत लाभदायी म्हणजे हा आसन प्रकार आहे.
****************************************
पश्चिमोत्तानासन
पश्चिम या शब्दाचा अर्थ पाठीकडची बाजू असाही होतो. या आसनात पायाच्या घोट्यापासून मस्तकापर्यंतचा पाठीचा भाग ताणला जातो. म्हणून याला ‘पश्चिमोत्तानासन’ असं सार्थ नाव दिलेलं आहे.

कृती
सपाट जमिनीवर पाय पसरून बसावं.
पायाचे अंगठे आणि टाचा एकमेकांना जोडून ठेवावेत.
मान सरळ आणि समोर असावी.
कमरेत वाकून हात पावलांकडे न्यावेत. दोन्ही हातांच्या तर्जनींना हुकाप्रमाणे आकार द्यावा व त्या त्या बाजूकडील पायांचे अंगठे अडकवावे.
कमरेपासून वरचे शरीर व हात ढिले करावेत. म्हणजे शरीर पुढे व खाली झुकू शकेल. कोप-यामध्ये हात वाकू लागतील. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. मात्र डोकं गुडघ्याला टेकवू नये किंवा पायदेखील वर करू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे झुकावे.
संथ श्वास चालू ठेवावा.
थोडा वेळ याच स्थितीत बसावं.
हळूहळू हाताची पकड सोडत पूर्वस्थितीत यावं.

फायदे
शरीराच्या पाठीकडील बाजूचे स्नायू, विशेषत: मांडीच्या मागील आणि कमरेचे स्नायू जास्त लवचिक बनवतात.
पाठीच्या कण्यावरील ताणामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारतं व मणक्यांतून निघणा-या नाड्या (मज्जातंतू) अधिक कार्यक्षम बनतात.
खुरटलेली उंची वाढवण्यास या आसनाचा उपयोग होतो.
पोटावर, विशेषत: ओटीपोटावर घनदाब निर्माण झाल्याने तेथील मेद कमी होतो.
तरुण वयात निर्माण होणारे वीर्यदोष व तरुण स्त्रियांना जाणवणारा मासिक पाळीच्या अतिरिक्त स्त्रावाचा त्रास या आसनाच्या सरावानं नाहीसा होतो.
सायटिका, पाठीची व कमरेची इतर दुखणी या आसनाच्या योग्य व नित्य अभ्यासाने दूर होतात. पचनक्षमता सुधारते.
***********************************
चक्‍की चलनासन
योगचं हे आसन पोटाची चर्बी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या योगात वजन कमी करण्यात मोठी मदत होते. पहिल्यांदा जमीनवर तुम्ही आरामत बसा, या दरम्यान तुमचे पाय सरळ पसरवा. दोन्ही पाय एकमेकांना लागून असले पाहिजेत, याचं भान ठेवा आणि गुडघ्यांना न वाकवता गोलाकार आकारात फिरवा. दहा वेळेस या आसनाला घड्याळ्याच्या दिशेने फिरवा आणि काही वेळाने घड्याळ्याच्या विरूद्ध दिशेने फिरवा, आणि नंतर सोडून द्या.'

============

नैसर्गिक रित्या वजन घटवायचे आहे का?


हे अगदी सहज शक्य आहे, त्या साठी रात्रीची झोप उडवायची गरज नाही.

“मला वाटते की माझं वजन खूप वाढलं आहे आणि मला बारीक व्हावचं लागेल.” ह्या एका विचाराचे रुपांतर काहीही करून वजन घटवण्याचे उपाय शोधण्यामध्ये होते.

शरीर सुडौल राखण्यासाठी व्यायामशाळेत तासंतास व्यायाम करणे, जिभेवर ताबा ठेवत मिळमिळीत अन्नाची सवय लावणे असे अनेक उपाय आपण करून बघितले असतीलच. पण समजा तुम्हाला एक नैसर्गिक, दुष्प्रभाव नसलेला, अत्यंत सुलभ आणि १५-२० मिनिटं घेणारा उपाय मिळाला तर कसं राहील?

ध्यानसाधना; अतिशय सुलभ पण अत्यंत प्रभावी तंत्र. ध्यानसाधना तर मन शांत करण्यासाठी असते, मग त्याचा वजन कमी करण्याशी काय संबंध, असा विचार मनात येतोय का? ते कसं शक्य आहे ते पुढे पाहू या........


#१ सहजपणे बीएमआर कमी करा:

जर तुम्ही वजन घटवण्याच्या “मोहिमेवर” असाल तर नियमितपणे BMR *(Basal Metabolic Rate) म्हणजेच  खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याची गती) तपासण्याची गरज असते. तुम्हाला तुमच्या शरीराचा BMR माहित असेल तर तुम्ही तुमच्या जेवणातील कॅलरिज कमी करू शकता जेणेकरून वजन आपोआप नियंत्रित राहील. ध्यान केल्याने तुमचे BMR आपणहून कमी होते. म्हणजेच अतिरिक्त कॅलरिज घेण्याचे प्रमाण आपसूकच कमी होते ज्यामुळे वजन आपोआपच कमी हेते.

#२ तुमच्या व्यामाची सवय शिस्तबद्ध असू द्या:



तुमच्या लक्षात आले असेल की जर तुम्ही काही दिवस व्यायाम केला नाहीत तर लगेच तुमचे वजन पुन्हा वाढू लागते. ह्याचे कारण, तुम्ही जेवढं जेवता तेवढ्या कॅलरिज जाळत नाही. व्यायाम केल्याने फक्त तुमची भूक वाढते पण अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होत नाही.

योगाभ्यास केल्याने अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते व जड असलेले अन्न सेवन करण्याची रुची कमी होते. म्हणजेच भूक तर लागते पण थोडेसे खाउन तृप्ती येते. ह्याचा दीर्घकालीन परिणाम असा होतो की तुम्ही काही दिवस व्यायाम सोडला तरी वजन लगेच वाढत नाही.

#३ तुमचा समतोल पुनर्स्थापित करा


अवाजवी वजन वाढणे किंवा कमी होणे हा होरमोन्स (संप्रेरक) असंतुलित झाल्याचा परिणामही असू शकतो. ध्यानसाधना केल्याने शरीरातील सर्व प्रणालींचा ताळमेळ जमून येतो. परिणामी तुम्ही स्थूल असाल तर वजन कमी करता येते किंवा तुमचे वजन कमी असेल तर ते वाढवता येते.

#४ चटक खाणे कमी करा

वजन घटवण्यात सगळ्यात मोठा अडसर म्हणजे लज्जतदार पदार्थ खाण्याची लागलेली चटक. एखाद्या मिठाईच्या दुकानाजवळून जाताना आसपास दरवळणाऱ्या गोड वासामुळे तो पदार्थ घेऊन खाण्याचा मोह आवरत नाही. पण नियमित ध्यान केल्याने मनावर ताबा ठेवणे थोडं सोपं होतं.

ध्यान केल्याने सजगता वाढते, आपल्याच खाण्या पिण्याच्या सवयींबाबत सतर्कता वाढते. मग पुन्हा कधीही तुम्ही चॉकलेट किवां चिप्स घ्यायला जाल तेव्हा तुम्ही सतर्क व्हाल की हे खाल्ल्याने माझे वजन वाढेल. मग त्याऐवजी तुम्ही दुसरे काही तरी पौष्टिक पर्याय शोधाल. काही कालांतराने नियमित ध्यान केल्याने तुमच्या इच्छा नाहीशा होतात. मग तुम्ही ते चिप्स किंवा चॉकलेट घेण्यास कधीच जाणार नाहीत.

दिव्या सचदेव म्हणतात: “गेल्या एका वर्षापर्यंत मला चॉकलेट खाण्याची इतकी सवय होती की दिवसातून एक तरी चॉकलेट खाल्ले नाही तर मी अस्वस्थ व्हायचे. माझं वजन भरपूर वाढत होतं पण ह्या सवयीचा त्याग कसा करावा तेच कळत नव्हते. पण दोन महिने नियमित ध्यान केल्याने चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा / वासना / लालसा कमी झाली.  मी नियमीतपणे ध्यान करणे चालू ठेवले आणि माझं वजन ७ किलोनी कमी झालं”.

# ५ आपला संकल्प मजबूत असू द्या:

आपली  वजन कमी करण्याची मोहीम अर्धवट सोडून देणे किती सोपे असते माहित आहे का?  अतिनिद्रा, अरबट चरबट खाणे व गोड पदार्थ ह्यांचा तुमच्या मोहिमेवर परिणाम सहज होऊ शकतो. ही तुमच्या संकल्प शक्तीची परीक्षा ठरू शकते. इथेही ध्यानाचा फायदा नक्कीच होऊ शकतो. ध्यान केल्याने तुमची संकल्प शक्ती वाढते ज्यामुळे व्यायाम करणे, हलका सुपाच्य आहार घेणे व चांगल्या सवयी ठेवण्या प्रतीची प्रतिबद्धता वाढते.

ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण करण्याची शक्ती मिळते.

मयंक ठक्कर म्हणतात: “ध्यान केल्याने अंत:शक्ति आणि इक्छा शक्ति मिळते ज्याच्यामुळे रोज व्यायाम करण्यासाठी मी प्रतिबद्ध राहू शकतो.”

#६ भरपूर भाज्या खा आणि तणाव दूर ठेवा

ज्या वेळेस तुम्हाला चॉकलेट किंवा इतर अरबट-चरबट खाण्याची इच्छा होईल, तेव्हा तुम्ही थोडा विचार करा की मी हे का खात आहे? घरचा किंवा कामावरचा काही तणाव विसरण्यासाठी मी हे खात आहे का? मनातील तणावामुळेही वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा होत राहते. ह्यामुळे थोडा फार तणाव निवळतो पण ध्यान केल्याने खोलवर जमा झालेला तणाव नैसर्गिकरीत्या निवळू लागतो. ध्यान करणे ही नैसर्गिकरीत्या तणाव निवारणाची व त्याच बरोबर वजन नियंत्रित ठेवण्याची उत्तम पद्धत आहे.

कोमल कौर म्हणतात, “पूर्वी जेव्हा माझ्या बॉय फ्रेंडशी माझं भांडण व्हायचं त्या वेळेस तणाव दूर करण्यासाठी मी वाजवी पेक्षा जास्तं खायचे. पण माझ्या वजन कमी करण्याच्या मोहिमेत जेव्हापासून सुदर्शन क्रिया आणि ध्यानाला समाविष्ट केलं, तेव्हापासून चित्र बदललं. ह्याचं कारण की परिस्थिती कशीही असली तरी मी शांत राहू लागले आणि तणाव घालवण्यासाठी जास्तं खाणं कमी झालं, वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली.

#७ वजन कमी करण्यासाठी वेळ देण कठीण होतेय का?

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामाला वेळ देता येत नसेल तर ध्यान करणे हा रामबाण उपाय ठरू शकतो. ‘ध्यान केल्याने दिवसभरात जास्तं वेळ मिळू लागेल ! . आणि ध्यान करण्यासाठी फक्त १५-२० मिनिटं लागतात. दिवसभरात तेवढा वेळ काढणे सहज शक्य आहे नाही का?  तुमच्या शरीराला तेवढा वेळ देणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तुमची कार्यक्षमता प्रचंड वाढते, ह्याचा परिणाम म्हणजे तुम्ही कोणताही काम लवकर आटपू शकता. परिणामी वजन घटवण्याच्या मोहिमेला जास्तं वेळ देऊ शकाल.

#८ स्वत:चेच लाड करा (लाडके बना)


विचित्र वाटतंय? पण प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा आपणच आपला लट्ठपणा स्वीकारलेला आहे तर मग वजन कमी करण्याची गरजच काय? ह्याचं उत्तर असं की अशी स्वीकृती आली की मन शांत होते आणि चिंता करणे थांबते. अशा मनस्थितीमुळे वजन कमी करण्याकडे जास्तं लक्ष देता येते, आणि तुम्ही केलेले प्रयत्न जास्तं परिणामकारक ठरतात.

सूचना: प्रत्येकाची शरीर बांधणी वेगळी असते त्यामुळे योग-ध्यान केल्याने त्याचा प्रत्येकावर होणारा परिणाम वेगवेगळा असू शकतो, भिन्न अनुभव असू शकतात. म्ह्णूनच आपल्या अनुभवाची तुलना दुसऱ्याच्या अनुभवाशी करू नये. संयम राखा, ध्यान म्हणजे जादूची कांडी नव्हे ज्याचा परिणाम लगेच दिसून येईल. रोज अभ्यास / सराव केला तर नक्की फरक जाणवेल.
============

आता सुधारित यादी खाली पहा:

कमी कॅलरीयुक्त समतोल आणि पोषक आहार कसा असतो?

    सकाळी ६ वा. १ कप चहा (४ पार्ले-जी बिस्किटे बाद) (60 कॅलरीज )
    सकाळी १० वा. आॅफिसमध्ये दोन इडल्या (वडापाव बाद)(120 कॅलरीज )
    सकाळी ११.३० वा. १ कप चहा (60 कॅलरीज )
    दुपारी लंच साठी:
        ३ पोळ्या (चपात्या) (१ पोळी कमी)(300 कॅलरीज )
        १ भाजी (१ भाजी कमी) (७५ कॅलरीज )
        १ वाटी डाळ (80 कॅलरीज )
        १ मूद भात (80 कॅलरीज )
        तळलेला पापड बाद (0 कॅलरीज )
        १ वाटी दही (80 कॅलरीज )
        गुलाबजाम किंवा २ जिलब्या बाद (0 कॅलरीज )
    दुपारी ३.३० वा. १ कप चहा (60 कॅलरीज )
    सायंकाळी ५ वा. १ वडापाव (१ वडापाव बाद) आणि १ कप चहा (210 कॅलरीज )
    सायंकाळी ७ वा. १ कप चहा (५० ग्राम फरसाण बाद) (60 कॅलरीज )
    रात्री डिनरसाठी:
        ३ पोळ्या (चपात्या) (१ पोळी कमी)(300 कॅलरीज )
        १ भाजी (१ भाजी कमी) (७५ कॅलरीज )
        १ वाटी डाळ (80 कॅलरीज )
        १ मूद भात (80 कॅलरीज )
        तळलेला पापड बाद (0 कॅलरीज )
        १ वाटी दही (80 कॅलरीज )
        १ केळे (100 कॅलरीज )

एकंदर: १९०० कॅलरीज. सुधारित यादीनुसार पूजा दिवसभरात 1900 कॅलरीजचा आहार घेते. १९०० कॅलरीज म्हणजे २७०० पेक्षा ३० टक्क्यांनी कमी आहेत.

अशाच प्रकारे तुम्ही तुमची सुधारित यादी घरच्या घरी बनवू शकाल
कमी कॅलरीयुक्त समतोल आणि पोषक आहार यांपासून बनवा

    जास्त चोथायुक्त पदार्थ

    डाळी / कडधान्यं: छोले, वाटाणे, हरभरे, डाळ, उसळ इ.
    मोड आलेली कडधान्यं (मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.)
    हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी
    पपई, पेरू, बोरे, कलिंगड, नाशपाती, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळे
    आख्खी कडधान्ये- उदा. मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.
    कुरमुरे, भाजलेले चणे, मक्याचे कणीस, ओला हिरवा मटार इ.
    गहू, बाजरी, ज्वारी यांच्या पिठांच्या पोळ्या/भाकऱ्या
    पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या
    पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या रव्याची खीर किंवा उपमा
    व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच

खालील पदार्थ टाळा:

    गूळ किंवा साखर (अगदी मध सुद्धा) घातलेले सर्व पदार्थ
    कोकाकोला, पेप्सी, मिरिंडा, मॅंगोला, लिम्का यांसारखे सर्व कोल्ड्रिंक्स
    तळलेले सर्व पदार्थ
        फरसाण: बाकरवडी, शेव, तळलेला चिवडा, चकली, गाठिया इ.
        सर्व प्रकारची भजी: कांदाभजी, बटाटा-भजी, गोल भजी इ.
        वडे, सामोसे, मेदूवडे, दहीवडे इ.
        मिसळ आणि मिसळ-पाव
        शंकरपाळी, जिलेबी, बर्फी, पेढे, गुलाबजाम, लाडू, वगैरे मिठाया
    सर्व बेक केलेले पदार्थ (बेकरी प्रोडक्ट्स):
        बिस्किटे: ग्लुकोज, गुड-डे, २०-२० इ.
        सर्व प्रकारचे केक, नानकटाई, खारी, इ.
    साबुदाणा, मैदा,रवा, खवा (मावा) यांपासून बनविलेले सर्व पदार्थ
    पांढरा भात, बटाटा, रताळे कमी प्रमाणात कमी वेळा खा.
    पिकलेले आंबे, चिकू, केळी प्रमाणात खा.

खालील पदार्थ खायला हरकत नाही:

    कुरमुरे चिवडा (न तळलेला असावा)
    पोहे, इडली, कमी तेल/लोणी असलेला डोसा (low fat dosa)
    व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच(कमी लोणी असलेले (low fat sandwich))
    भाजके चणे
    भाजलेले मक्याचे कणीस
    उकडलेले हिरवे वाटाणे

pot kami karnyasathi upay marathi

vajan kami karne marathi tips

vajan kami karne ke upay marathi

pot kami karnyache upay

vajan kami karayche gharguti upay

vajan kam karne ke tips

vajan kami karnyasathi kay karave

potache vyayam in marathi

vajan kami karne ke upay marathi

surya namaskar

vajan kami karayche gharguti upay

vajan kami karnyasathi kay karave

vajan kami kara

vajan kam karne ke tips

vajan kase kami karave

charbi kami karne upay in marathi

vajan kami karnyasathi kay karave

vajan kami karayche gharguti upay

vajan kami karne ke upay marathi

vajan kam karne ke tips

vajan kami kara

vajan kami karnyache upay in hindi

vajan kam karne ke upay marathi

potache vyayam in marathi