Friday, September 30, 2016

6:02 PM

मध आणि लिंबू - Honey and Lime - Madh and Limbu



 कमाल लिंबाच्या शक्तीची


लिंबू आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. गरम पाण्यात थोडंसं लिंबू पिळून तयार होणारं लिंबूपाणीही तितकंच लाभदायक आहे. त्याविषयी...

पचन क्रियेला मदत

सकाळी उठल्यावर एखाद्या लिंबाचा रस कोमट पाण्यासह रिकाम्या पोटी प्यायल्यास आंत्र जठर प्रक्रियेला उत्तेजन मिळतं. ही क्रिया नियमित केल्यास पचन क्रिया सुधारते आणि हृदयातील जळजळही कमी होते.

यकृताचं निर्विषीकरण

लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड असतं. त्यामुळे यकृतातील प्रक्रिया सहज होण्यास मदत होते. तसंच यकृताचं निर्विषीकरण होण्यास उत्तेजन मिळतं.

पित्तासाठी गुणकारी


अनेकांना पित्ताचा त्रास होतो. पण लिंबू पाण्यामुळे पित्त कमी व्हायला मदत होते. लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड असल्याने त्यातील पौष्टिक घटक आणि खनिज ही अल्कलाइन प्रकारात मोडतात. सायट्रिक अॅसिड हे जास्त प्रभावी अॅसिड नसून ते शरीरातून वेगळं करणं सहज शक्य आहे. लिंबाचा रस शरीरात कॅल्शिअम कार्बोनेट हे प्रभावी अॅसिड तयार होण्यास विशेष उत्तेजना देतं. चीज किंवा मटणासारख्या पचनास जड अशा पदार्थांच्या पचनाच्या वेळी हे अॅसिड कामी येतं. तज्ज्ञांच्या मते पीएच लेव्हल सांभाळण्यास आणि लघवीच्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी लिंबाचा रस उपयोगी असतो.

रोग प्रतिकारक शक्ती वाढते

लिंबू असलेले सर्व पदार्थांमध्ये विटामिन सी (क जीवनसत्त्व) मोठ्या प्रमाणात आढळतं. हे विटामिन (जीवनसत्त्व) आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. लिंबामध्ये पोटॅशिअमही काही प्रमाणात आढळते. पोटॅशिअममुळे मेंदू आणि शरीराच्या चेता यंत्रणेला चालना मिळते. तर रक्तदाबही नियमित राहतो.

त्वचेसाठी उपयुक्त

तज्ज्ञांच्या मते लिंबातील व्हिटॅमिन सी (क जीवनसत्त्व) हे त्वचेसाठी अत्यंत चांगलं आहे. ते त्वचेत कोलाजेन तयार होण्यास मदत करते. यातील अॅन्टीऑक्सिडंट त्वचा पुनरुज्जीवित करतात आणि निरोगी ठेवतात. कोमट लिंबू पाण्यामुळे रक्तातलं टॉक्सीनचं प्रमाण कमी होतं. लिंबाचा रस त्वचेवरील डागांवर लावल्यास ते कमी होतात.

लिंबाच्या वापराचा अतिरेक करू नका. एका लिंबाच्या रसामुळे जर दोन किलो वजन कमी होण्यास मदत होत असेल तर चार लिंबाच्या रसाने अधिक वजन कमी होणार नाही, हे ध्यानात घ्या. लिंबामध्ये क्षार जास्त असल्याने त्याचं जास्त सेवन केल्यास, तुमच्या दातांना त्रास होऊ शकतो.

प्रत्येक वेळी लिंबू पाणी प्यायल्यावर साध्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. चूळ भरून टाका. यामुळे दातांना कोणताही त्रास होणार नाही.

लिंबू पाण्यात थोडंसं मध टाकून प्यायल्यास ते कफावरही गुणकारी ठरेल.

बाजारातून किंवा दुकानातून आणलेल्या लिंबू पाण्याच्या बाटलीतलं लिंबूपाणी कामाचं नाही. फक्त नैसर्गिक लिंबाचा रसच आरोग्याला चांगला असतो. 

================

 सुंदर त्वचेचं घरगुती रहस्य

रोजच्या दगदगीच्या आयुष्यात स्वतःच्या त्वचेची काळजी घेणं अगदी गरजेचं होऊन बसतं. त्यात रोजच्यारोज पार्लरला जाणं काही शक्य नसतं. शिवाय सतत कृत्रिम साधनांनी सौंदर्य वाढवणं हे फारसं चांगलंही नव्हेच. म्हणूनच आज काही 'होममेड फेसपॅक'बद्दल. आपला खिसा आणि त्वचा दोन्हीला आवडतील असे हे फेसपॅक करून बघाच.

मध : हातात फार कमी वेळ असेल तर हे मधाचं फेसपॅक तुमच्यासाठी अगदी योग्य ठरेल. चेहऱ्यावर एकसमान मध लावा आणि पंधरा मिनिटांनंतर एक कपडा पाण्यात बुडवून, पिळून चेहरा पुसून घ्या. जर त्या मधात तुम्ही सुकवलेल्या संत्राच्या सालांची पावडर करून घातलीत तर तुमची त्वचा आणखीनचं तुकतुकीत दिसेल.

चविष्ट पपईचं फेसपॅक : पपईचा पल्प घ्या, त्याला कुस्करा आणि त्यात दूध घाला. हळू-हळू सर्व मिश्रण ढवळा आणि त्याची पेस्ट करा. मग ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने तो फेसपॅक धुवा. आणि मग तुमच्या चेहऱ्यावर आलेलं तेज काही आगळंच असेल.

बदाम आणि दुधाचा फेसपॅक : तीन ते चार बदाम दुधात भिजत ठेवा. थोड्या वेळाने त्याची सालं काढून ते सर्व बदाम मिक्सरला लावा. त्या पावडरमध्ये हळू-हळू दूध घालून त्याची जाडसर पेस्ट बनवा. दुसरी पद्धत म्हणजे बदामाच्या तेलात मलई घालून त्याला चेहऱ्यावर लावा. दहा-पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. तेलकट त्वचा असलेल्यांनी हा फेसपॅक टाळावा.

चंदन-गुलाबपाणीचं फेसपॅक : चंदन आणि गुलाबपाणी यांची पेस्ट बनवा. प्रथम आपला चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तो एका कापडाने टिपून घ्या. चेहरा पूर्णतः कोरडा झाल्यावर त्यावर हा बनविलेला फेसपॅक लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होतो. तुम्ही उन्हातून, दगदगीतून घरी आल्यावर हा फेसपॅक नक्की लावा. तुमची त्वचा तर स्वच्छ होईलच पण त्या सोबत तुम्हाला थंडही वाटेल.

बेसन-दह्याचं फेसपॅक : तीन ते चार चमचे बेसन, तितक्याच प्रमाणात दही आणि त्यात दोन चमचे मध. या सर्व मिश्रणाची पातळ पेस्ट बनवा आणि ती चेह‍ऱ्यावर समप्रमाणात लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. जेणेकरून बेसन आणि दह्यामुळे त्वचा उजळून निघेल आणि मध तुमची त्वचा मॉईश्चराइज करेल.

तेलकट त्वचेसाठी फेसपॅक

मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणीः मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणी यांना एकमेकात मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ती आपल्या चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक तेलकट त्वचेसाठी सर्वात उत्तम ठरतो. बाजारात मुलतानी मिट्टी अगदी आरामात उपलब्ध होईल. आणि त्यात हा फेसपॅक बनवायला वेळही लागत नाही.

टॉमेटो, लिंबू आणि मधः एका वाटीत टॉमेटोचा बल्क घ्या, त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या. या सर्व मिश्रणाची पेस्ट बनवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. टॉमेटो आणि लिंबू तुमची त्वचा उजळवायला मदत करेल तर मध तुमच्या चेहऱ्यावर तजेला आणेल.

लिंबू आणि दुधः
एका वाटीत तीन चमचे दूध, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन छोटे चमचे हळद घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे चेह‍ऱ्यावरचा तेलकटपणा जाईल.

संत्र-लिंबू आणि मध‍ः
संत्र्याच्या सुकलेल्या सालींची मिक्सरला लावून पावडर बनवा; त्यात लिंबाचा रस आणि मध घाला. त्याची ढवळून जाडसर पेस्ट तयार करा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. जवळपास वीस मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा नीट धुवा. हा फेसपॅक तुम्हाला नक्कीच उत्तम परिणाम देईल.

काकडी आणि लिंबूः काकडीमुळे त्वचा तर उजळतेच. पण तुमच्या त्वचेवरचा टॅन घालवायलाही मदत करेल. काकडीचा एक चमचा रस एका वाटीत घ्या. त्यात एक चमचा मध आणि एक चमचा हळद घाला. या मिश्रणाची पेस्ट बनवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण डोळ्यांभोवती आवर्जून लावा कारण त्यामुळे डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ कमी होतात. पंधरा मिनिटांनी पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक तुम्ही रोज वापरल्यास तुम्हाला उत्तम परिणाम दिसेल.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. पण घरच्याघरी करता येतील, असेही काही उपाय आहेत. काही घरगुती फेसपॅकबद्दल...

लिंबू आणि कोरफड

लिंबाचा रस आणि कोरफडीच्या पानांचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने स्कीन टॅन कमी होतं.

दही आणि बेसन

दही आणि बेसनाचं मिश्रण चेह‍‍ऱ्यावर आणि हातांवर वगैरे लावावं. ते सुकल्यावर गरम पाण्याने धुवून टाकावं. त्यामुळे त्वचा मऊ आणि तेजस्वी होते.

चंदन आणि गुलाबपाणी

सनबर्नपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी हे उत्तम मिश्रण आहे. हा फेसपॅक लावल्याने ताजंतवानंही वाटेल.

मध आणि हळद

मध आणि हळदीचं मिश्रण करून लावल्यास त्वचेवर खूप चांगले परिणाम दिसतील. कारण हे एक उत्तम घरगुती मॉइश्चरायझर आहे.
=====================

थंडा मतलब...!


उन्हाळ्याच्या या दिवसांत आइस्क्रीम, मिल्कशेक्स, थंडपेय याची अगदी रेलचेल असते. रोजच्या रोज न चुकता आइस्क्रीम खाणारेही अनेक खवय्येही आहेत. दर उन्हाळ्यात कोणती ना कोणती नवी चव आपल्या जिभेला खुणावत असते. यंदा कोणत्या नवनव्या चवी आणि स्वाद बाजारात आलेत त्यावर एक नजर...

मिल्कशेकचा पहिला घोट, सरबताचा पहिला थेंब आणि जिभेवर एंट्री घेताक्षणी गारेगार करून टाकणारं आइस्क्रीम.... डोक्यावरचं ऊनही बघता बघता या थंडगार चवीत विरघळून जातं. यंदाच्या उन्हाळ्यात या थंडाव्याला कोणते स्वाद मिळालेत त्याची एक झलक...

रंग शरबतोंका..

उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी सगळ्यात सोप्पा मार्ग ‌म्हणजे सरबतं. कैरी पन्हं, ताक, लिंबू सरबत, लस्सी अशा देशी सरबतांबरोबरच यंदा ब‍‍ऱ्याच परदेशी पाहुण्यांनी या शरबती विश्वात प्रवेश केला आहे. मोयितो, फ्रुट पंच, स्मुदीसारखी सरबतं यंदा बाजारात दिसून येतायत.

मोयितोची जादू

मोयितो हे एक स्पॅनिश पद्धतीचं सरबत आहे. यात व्हाईट रम असते. आपल्याकडे मात्र क्लब सोडा घालून मोयितो बनवतात. पुदिना, आंबा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, लिची, संत्र अशा ब‍ऱ्याच स्वादांमध्ये मोयितो उपलब्ध आहेत. घरच्या घरीही तुम्ही हे मोयितो बनवू शकता.

साहित्य - १० ते १२ पुदिन्याची पाने, ४ ते ५ क्लब सोडा, ५ चमचे लिंबाचा रस, ५ ते ६ चमचे बर्फाचा क्रश, १ चमचा जलजीरा, अर्धा चमचा आलं, ५ चमचे साखरेचा पाक, पाणी आणि मध थोडंसं उकळून घ्या. मिश्रण घट्ट होत असताना पाक झाला असं समजावं.

कृती - एका ग्लासामध्ये पुदिन्याची पानं, क्लब सोडा, जलजीरा, साखरेचा पाक, लिंबाचा रस, आलं एकत्र करून घ्या. हे सगळं लाकडी चमच्याने ठेचून घ्यावं. ते करताना पुदिन्याची पानं खूप वाटली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सरतेशेवटी यात बर्फाचा चुरा आणि पाणी घालावं. लिंबाच्या चकत्या आणि पुदिन्याची पानं लावून सजवावं.

आइस्क्रीमची ओढ

उन्हाळा आणि आइस्क्रीम हे एक अतूट नातं. सध्या मात्र आइस्क्रीमच्या चवीमध्ये अनेक नवनवे स्वाद आलेले दिसतात. आंबा, व्हॅनिला, चॉकलेट, पिस्ता बदाम अशा नेहमीच्या चवींखेरीज मसाला पान, गुलकंद, मिरचीपर्यंत निरनिराळ्या चवीची आइस्क्रीम चाखायला मिळतील. यासोबतच थंडाई, राजभोग, गुलकंद असे स्वाद आहेत. तर फळांमध्ये आंब्याव्यतिरीक्त चिकू, नारळ, कलिंगड, पपई, सीताफळ, लिची, अननस, अंजीर, फणस, जांभूळ, कच्ची कैरी, टरबूजापर्यंत अनेक निरनिराळ्या चवी आपल्या जिभेच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. यासोबतच तीन चार फ्लेवर्स एकत्र करून दिलं जाणारं गडबड आइस्क्रीम, किंवा दह्याचं बनलेलं योगर्ट आइस्क्रीम खाणा‍ऱ्यांची संख्याही कमी नाही.

मिल्कशेकची जादू

आइस्क्रीमनंतर नंबर लागतो तो मिल्कशेकचा. घरातून बराच काळ बाहेर असताना कधीकधी भूकही लागते आणि तहानही. हे दोन्ही भागवणारा हुकुमी एक्का म्हणजे ‌मिल्कशेक. इतर वेळी दुधाला नाकं मुरडणारी मंडळी तेच दूध मिल्कशेकच्या रुपात आल्यावर मात्र अगदी आवडीने गट्टंम करतात. मिल्कशेकमध्येही आता एकदम भन्नाट स्वाद येऊ लागलेत. बडीशेप, कॉफी, स्ट्रॉबेरी, किवी विथ स्ट्रॉबेरी, मिल्कशेक विथ क्रश्ड क्रीम अशा निरनिराळ्या हटके प्रकारांची चलती आहे. सोबतच रबडी, बासुंदी, बनाना मिल्क, अंजीर, रासबेरी, ड्रायफ्रुट बेस मिल्कशेकसारख्या जुन्या प्रकारांनाही खवय्यांची पसंती आहेच. आइस्क्रीम आणि चॉकलेट बेस मिल्कशेकसुद्धा आहेतच. आइस्क्रीम किंवा चॉकलेट बेस्ड मिल्कशेकमध्ये आंब्याचे तुकडे किंवा आंब्याच्या रसाचा कल्पक वापर करून निरनिराळे मिल्कशेकचे प्रकार बनवले जात आहेत. याशिवाय दोन वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक एकत्र करून तयार केले जाणारा फ्युजन मिल्कशेकही खवय्यांची पसंती मिळवत आहेत.

रसायन

रसायन हा थोडा वेगळा प्रकार आहे. अगदी ३०-३५रुपयांपासून ते ४००रु. पर्यंत किंमतीत तो तुम्हाला मिळू शकतो. दक्षिण मुंबईमध्ये तर तो खूप जास्त लोकप्रिय आहे. या प्रकारात केळ हे मुख्य फळ आणि सोबत इतर ४-५प्रकारची फळं घातलेली असतात. रस्त्यावरच्या गाडीपासून ते चकाचक मॉलपर्यंत ब‍ऱ्याच ठिकाणी हा पदार्थ चाखायला मिळू शकतो.

आइस्क्रीम केक

वॉलनट ब्राऊनी बरोबर व्हॅनिला आइस्क्रीम अनेकांनी खाल्लं असेल. पण या उन्हाळ्यात वेगवगेळ्या स्वादाच्या केकबरोबर वेगवेगळी आइस्क्रीम्स चाखणा-यांची संख्या वाढल्याने विक्रेत्यांनी आइस्क्रीम केक हा नवीन प्रकार उपलब्ध करुन दिला आहे.


 लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण पावसाच्या धारा अंगावर घेण्यासाठी आतुर असतात. पावसाने हजेरी लावली की सगळ्यांच्या आनंदाला उधानच येतो. या पावसात भिजल्यानंतर कितीही मज्जा आली तरी नंतर काही आजार होण्याची भिती असते, त्यामुळे चला पाहूयात अशा आजारांपासून बचाव करण्याचे काही घरगुती उपाय ...

 आलं- एक आल्याचा तूकडा घेऊन तो पाण्यात उकळा त्यात लिंबू आणि मध घालून प्या.

 मध- मध हे 'अॅन्टीऑक्सीडंट'ने परिपूर्ण असते. कफ झाला असल्यास किंवा घसा दूखत असल्यास एक चमचा मध आणि लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास आराम मिळतो.

कडूलिंब
व्हायरल इनफेक्शन झाल्यास कडूलिंबाची १०-१२ पाने उकळून घ्या आणि दिवसातून २-३ वेळा याचे सेवन केल्यास तुमची इम्यूनीटी पॉवर वाढण्यास मदत होईल.

============

आरशात बघायला आवडत नाही, अशी ना मुलगी आढळेल ना स्त्री. आपले सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी 'सजना हैं मुझे'ची ओढ प्रत्येकीलाच असते. केसांची निगा राखण्यासाठी रोज मसाज करणे, तसेच हिरव्या पालेभाज्या खाणे, केसांच्या मुळांना तेलाची मालिश करणे असे विविध उपाय सुचविले. केस धुताना हर्बल शाम्पू, आवळा किंवा शिकेकाई यांचा वापर करावा.


त्वचेची घ्या रोज काळजी

कोरडी, तेलकट आणि सामान्य त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी डवरे यांनी विविध उपाय सांगितले. तेलकट त्वचा असल्यास मुरूम येण्याचा धोका असतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दिवसातून तीन ते चार वेळा आपला चेहरा धुवावा, अशी सूचना त्यांनी केली. चेहरा साफ करण्यासाठी दही, ताक, मध किंवा साखर अशा पदार्थांचा वापर करावा. ब्लिचिंग करण्यासाठी मसूर डाळ, मध आणि टोमॅटो ज्यूस यांचे मिश्रण वापरावे, असे हर्बल उपायदेखील त्यांनी सुचविले. या कार्यशाळेला नागपूरकर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



टिप्स सौंदर्याच्या

केसातील कोंडा घालविण्यासाठी वापरा मध आणि लिंबू किंवा दही.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा स्टीमचा वापर.

जास्त तेलकट खाऊ नका.

मेकअप करण्यापूर्वी वापरा मॉइश्चरायजर आणि मेकअप काढण्यासाठी क्लिन्सिंग मिल्क.

घराबाहेर पडण्याच्या १५ मिनिटे अगोदर लावा सनस्क्रीम लोशन.

तेलकट त्वचेसाठी वापरा वॉटरप्रूफ मॉइस्चरायजर 

==========
थंडीच्या दिवसात महागडी सौंदर्य उत्पादनं वापरण्यापेक्षा काही सोप्या गोष्टी करूनही त्वचेची काळजी घेता येते.

१) चणाडाळ, उडीद डाळ, मसूर डाळी यांचं पीठ एकत्र करून त्यात पाणी आणि खडे मीठ घालून ते विरघळवून लावावं. यात साध्या पाण्याऐवजी दह्याचं पाणीही वापरता येईल.


२) ज्यांची त्वचा मुळातच कोरडी आहे, त्यांची त्वचा थंडीमध्ये जास्त सुरकुतलेली दिसते. अशांनी मध आणि लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रसानं स्क्रब करावं.

३) थंडीमुळे कडक गरम पाण्यानं आंघोळ करण्याची सवय अनेकांना असते. मात्र, त्यामुळे चेहऱ्यावरील उघड्या छिद्रांना हानी पोहोचून नवीनच समस्या उद्भवू शकते. सर्दी झाल्यावर वाफ घेतानाही ती अतिप्रमाणत घेतल्यास अशीच अडचण होते. यासाठी पाणी खूप कडक असू नये.

४) खोबरेल तेल, अॅरोमा किंवा तिळाच्या तेलानं मसाज करून आंघोळ करणं हा उपाय सर्वोत्तम आहे. तेवढा वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलंही तेल थोड्या प्रमाणात घालावं. म्हणजे त्वचेचं आपोआप मॉइश्चरायझिंग होतं.

५) रात्री बदाम भिजवून, सकाळी त्याची सालं काढून, पेस्ट करून ती संत्र्याच्या रसात मिक्स करून लावावी.

६) आंघोळीआधी त्वचेला पंचामृत लावल्यानंही त्वचेला मॉइश्चर मिळतं.
3:24 PM

पाणी पिण्याचे फायदे

नियमित कोमट पाणी प्यायल्याने होतात हे 8 आश्चर्यकारक फायदे...

पाणी पिण्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील. परंतु तुम्हाला कोमट पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत का... जर माहित नसतील तर आम्ही सांगतो. कोमट पाणी हे एका औषधी प्रमाणे आहे. नियमित कोमट पाण्याचे सेवन हे फक्त तुम्हाला निरोगी ठेवत नाही तर आरोग्यासंबंधीत अनेक समस्या दूर करते. चला तर मग जाणुन घेऊया कोमट पाणी पिण्याच्या फायद्यांविषयी...

1. त्वचे संबंधीत समस्या दूर
जर तुम्ही त्वचे संबंधीत समस्यांने त्रस्त असाल आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी विविध ब्यूटी प्रोडक्ट्स वापरुन देखील काहीच फरक पडत नसेल. तर नियमित एक ग्लास कोमट पाणी पिने सुरु करा. तुमच्या स्किन संबंधीत सर्व समस्या दूर होतील आणि स्किन ग्लो करेल.

2. मासिक धर्मासंबंधीत समस्या
तरुणींना जर पीरियड्सच्या काळात पोट दुखी होत असेल तर एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने आराम मिळतो. खरेतर या काळात होणा-या वेदना मासपेश्यां ताणल्या गेल्यामुळे होतो. जर आपण गरम पाणी पिले तर त्यांना आराम मिळतो.


3. किडनी निरोगी राहते
गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ यूरीनच्या रस्त्याने बाहेर निघून जातात. यामुळे किडनीवर कमी दबाव पडतो आणि किडनी निरोगी राहते. प्रयत्न करा की, दिवसातुन दोन वेळा कोमट पाणी पिता येईल.


4. भूक वाढते
ज्या लोकांना भूक न लागण्याची समस्या आहे त्यांनी रोज सकाळी एक ग्लास पाणी प्यायले पाहिजे. असे नियमित केल्याने त्यांना फायदा होईल.


5. पोटाच्या समस्या दूर होतात
गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. दिवसातुन दोन वेळा गरम पाणी प्यायल्याने तुम्ही पोटाच्या समस्यांपासुन दूर राहू शकता. सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातुन सर्व विषारी तत्त्व बाहेर निघतात, ज्यामुळे पुर्ण सिस्टम स्वच्छ होते.


6. संधीवात
संधीवात असणा-या लोकांनी गरम पाणी पिणे एखाद्या औषधी प्रमाणे आहे. नियमित कोमट पाण्याचे सेवन करणे हे जॉइंटमध्ये लवचिकता आणते, ज्यामुळे संधीवाताची समस्या कमी होते.


7. वजन कमी करते
वजन कमी करण्यात देखील गरम पाणी मदत करते. जेवणाच्या एक तासानंतर गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते. जर कोमट पाण्यात लिंबू आणि मधाचे काही थेंब मिळवून प्यायले तर बॉडी स्लिम होते.


8. इम्यूनिटी वाढते
एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू मिळवून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमीन सी मिळते. गरम पाणी लिंबूचे कॉम्बिनेशन शरीराच्या इम्यूनिटीला मजबूत करते.
3:18 PM

बद्धकोष्ठ - पोट साफ होण्यासाठी काय करावे




दिवसातून एकदा नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.

आहारातील पदार्थांचे प्रकार व प्रमाण
पोट साफ होण्यासाठी त्यात पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. काही पदार्थ जात्याच रुक्ष असतात व पोटात मैदा, मिठाई, बेसन, इ. पदार्थांनी पोट लवकर साफ होत नाही.
आपल्या शरीराला लावलेली सवय व दिनचर्या पोट साफ होणे-न होण्याला कारणीभूत ठरते.
-  बध्दकोष्ठ हा बहुधा चुकीच्या आहार-विहार सवयींचा परिणाम असतो.
-  रुक्ष आहाराने (उदा. फरसाण, चणे, चुरमुरे, फुटाणे) तात्पुरते बध्दकोष्ठ होते.
-  उतारवयात गुदद्वाराच्या कर्करोगाची शक्यता मनात ठेवून एकदा तरी तपासणी केली पाहिजे.
-  कॉफी जास्त पिण्याने आतडी मंदावतात व बध्दकोष्ठ होते.
-  तंबाखूच्या सेवनानेही बध्दकोष्ठता होते.
-  बध्दकोष्ठामुळे मळ कोरडा होऊन खडे तयार होतात यामुळे मळ बाहेर पडायला अवघड जाते.
-  पोटाच्या डाव्या बाजूला हाताने दाबून आपल्याला मोठया आतडयाचा भरीव घट्ट-कडकपणा जाणवतो.


उपचार
         लहान मुलांना बध्दकोष्ठ असेल तर एक सोपा उपाय करा.
एक-दोन चमचे तेलकट किंवा बुळबुळीत पदार्थ (उदा. गोडेतेल) गुदद्वारात भरल्यास आतले  मळाचे खडे 10-15 मिनिटांत बाहेर पडतात व दुखत नाही. यासाठी एरंडेल तेल, पॅराफिन (एक प्रकारचे पातळ मेण) किंवा साबणाचे पाणी वापरतात. हे फक्त एक-दोन चमचेच वापरायचे असल्याने हा एनिमा  नाही. (एनिमामध्ये पावशेर, अर्धा लिटर साबणाचे पाणी वापरतात.) मुलांना एनिमा देऊ नये.
पॅराफिनच्या लांबट गोळया मिळतात. वेष्टन काढून ही गोळी गुदद्वारात सारली की  थोडया वेळाने विष्ठा सैल होऊन सरकते.


बध्दकोष्ठाचा त्रास अनेक जणांना होतो. उपायही अनेक आहेत.
-  मळाचे कोरडे खडे झाले असल्यास ते बाहेर पडण्यासाठी तोंडातून औषध देण्यापेक्षा गुदद्वारामार्फत उपाय करणे चांगले. यासाठी जुन्या मऊ सुती कापडाची सुरळी (करंगळीइतकी जाड) करून एरंडेल तेलात भिजवून गुदद्वारातून आत सरकवावी. रुग्णास स्वत:सही ही क्रिया जमू शकेल. यानंतर तीन-चार तास पडून राहण्यास सांगावे (किंवा हा उपाय झोपताना करण्यास सांगावे). यामुळे कोरडे खडे तेलकट होऊन बाहेर पडणे शक्य होते. लहान मुलांसाठी आणि वृध्दांसाठी हा उपाय फार चांगला ठरतो. याऐवजी तेलाची पिचकारीही चालेल.
-  बध्दकोष्ठासाठी पोटातून उपाय करायचा असल्यास 15 ते 40 मि.ली. शेंगदाणा तेल  रात्री प्यायला द्यावे. त्यापाठोपाठ गरम पाणी किंवा चहा द्यावा म्हणजे जिभेवर तेलकट चव राहणार नाही. या उपायानेही खडे सुटतात.
-  सौम्य विरेचनासाठी त्रिफळा चूर्ण अर्धा ते दीड चमचा + एक कप गरम पाणी रात्री झोपताना द्यावे. त्रिफळा चूर्ण वारंवार घ्यायची वेळ आल्यास दर वेळेस 4-5 चमचे तेल किंवा तूप या बरोबर घ्यावे.
-  ज्यांना वारंवार मळाचे खडे होतात त्यांनी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.  फुटाणे, टोस्ट, फरसाण, पापडीशेव, पिठले, डाळमोठ, चिवडा, इत्यादी मूलत: कोरडे असणारे पदार्थ वर्ज्य करावेत. याऐवजी पालेभाज्या, मूग, मटकी, चवळी, इत्यादी चोथा-सालपटयुक्त पदार्थ घेणे चांगले.
-  जागरण करणे किंवा उशिरा झोपून उशिरा उठणे, हेही खडे होण्याचे कारण आहे. पहाटे उठून मलविसर्जन करणा-यास हा त्रास सहसा होत नाही.


होमिओपथी निवड
ब्रायोनिया, सीना, फेरम फॉस, लायकोपोडियम, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सिलिशिया



संडास साफ होण्यासाठी उपाय

पोट साफ होण्यासाठी काय करावे

संडास साफ न होणे

पोट साफ न होणे घरगुती उपाय

बद्धकोष्ठता उपाय

पोटाचे विकार


संडास साफ न होणे

पोट साफ न होणे

पोटाचे विकार

पोट दुखणे उपाय


3:12 PM

Pot Kami Karne Upay in Marathi

 ७ दिवसात आत जाऊ शकते पोट करा लठ्ठपणा दूर


pot kami karnyasathi upay marathi


लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे+छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे 7 दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल....

१. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

२. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

३. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

४. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

५. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

७. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.

७. जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.

८. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.

९. दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. ब्रेकफास्टमध्ये नेहमी एकसारखे पदार्थ सेवन करू नयेत.

१०. सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.

११. दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील वसा कमी होण्यास मदत होते.


=============
* व्यायाम  करणे, २४ x ७ आनंददायी  राहणे
* खरी भूक लागल्यावर आणि प्रसन्न चित्ताने, सावकाश खाणे.
* पोट भरावयाच्या आधी पूर्णविराम घेणे.

जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.

पोटाचा घेर किती असावा?
यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!

आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.

पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! मी स्वत: सुद्धा २०११ मध्ये धोक्याच्या पातळीवर होतो. माझ्या पोटाचा घेर ९६ सेंमी (३८ इंच) होता. आज मात्र मी तो ८६ सें.मी.वर (३४ इंच) आणला आहे. वैद्यकीय व्यावसायिकांची ही स्थिती आहे, तर इतरांबाबत काय बोलणार? खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते. मग नेमके करावे तरी काय?

प्रयत्नांची दिशा –
पोटाचा घेर कमी करावयाचा म्हणजे ‘गुलाबजामच्या थोबडीत मारणार आणि जिलेबी कधीच खाणार नाही!’, अशी दिशा बरेच जण निवडतात. यात ९९ टक्के भर काय खायचे व काय खायचे नाही यावर असतो. ही दिशाच मुळी चुकीची आहे. दिशाच चुकीची असेल तर उद्दिष्ट गाठणे कसे शक्य होणार? त्यामुळे ९९ टक्के भर केव्हा, काय, कसे व किती यावर हवा!

पोटाचा घेर वाढलेल्या व्यक्तीची मानसिकता –
‘मी आता असाच- ढेरीसकट मरणार’, ‘आता माझ्या पोटाच्या घेरात फरक पडणार नाही’ अशी नकारात्मक भावनाच सर्वसाधारणपणे आढळून येते. २०११ पर्यंत माझी मनस्थिती सुद्धा अशीच होती! वेगवेगळ्या पद्धती अवलंबूनही काहीच फरक न पडल्यामुळे ढेरी वाढलेल्या व्यक्ती हताश, निराश झालेल्या असतात. त्यात बऱ्याच जणांनी लाखभर रुपये खर्चही केलेला असतो. त्यामुळे त्यांचा स्वत:वरचा व अशा प्रकाराची सेवा देणाऱ्यांवरचाही विश्वास उडालेला असतो. त्यात भरीस भर म्हणून या व्यक्तींकडे वेळेचा अभाव असतो. व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही सर्वाचीच बोंब! पूर्वी ज्याला व्यायामाला वेळ नाही त्याची ‘वेळ’ जवळ आली आहे’, असे म्हणत असत! आता मात्र या वाक्याचाही काही उपयोग नसल्याचे दिसते.

आता पोटाचा घेर कमी करण्याचे सार पाहू
 
या – व्यायाम + दररोज  १२ सूर्यनमस्कार + आनंददायी २४x७!

खरी भूक लागल्यावर हवे ते-
(याला काही पदार्थ नक्कीच अपवाद आहेत.) प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे!..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट भरावयाच्या आधी थांबावे!

व्यायाम + आनंददायी २४x७  :
यात वयाच्या पस्तिशीपर्यंत आपण कधीच आणि काहीच व्यायाम केला नसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामास सुरुवात करणे इष्ट. व्यायामात १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हालचाल करीत राहा. बसून राहण्याऐवजी उभे राहा, उभे राहण्याऐवजी चालणे शक्य असेल तेव्हा तेव्हा चाला. नेहमीची, जवळच्या अंतरावरची कामे करण्यासाठी चालत जा, सायकल असेल तर ती वापरायला काढा. या हालचालींमुळे आपोआप व्यायाम होत राहील. जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा.

खरी भूक लागल्यावर :
खरी भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. ‘हवे ते खा’ म्हणजे नेमके काय?-  शिजवलेले अन्न (रोजचे जेवण) दिवसांतून दोन वेळा. एरवी दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा. हातसडीचा तांदूळ वापरणे फारच चांगले. घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे ऑडिट करा. (पूर्ण दिवसात माणशी २० मिली तेलाचा वापर योग्य.) जे काही खाल ते प्रसन्न चित्ताने आणि सावकाश खा. काहीही खाताना, पिताना आधी व्यवस्थित खाली बसा, शांतपणे, प्रसन्न मनाने, सावकाश, पंचेद्रियांनी अन्नाचा आस्वाद घेत खा. जेवणासाठी २०-३० मिनिटे वेळ ठेवा. घाई गडबड टाळा.

पोट भरावयाच्या आधी पूर्णविराम:
एखादा आवडता पदार्थ जेवणात असला, तर पोटात अजून थोडी जागा असतानाच जेवणाला पूर्णविराम देणे जड जाईल. पण हळूहळू हे नक्की जमेल. शक्यतो परत वाढून घेऊ नका म्हणजे याची सवय होत जाईल. पोट भरण्याचा सिग्नल मिळण्यास थोडा वेळ लागतो, हे ध्यानात    ठेवा.
ठरवल्या तर वरील सर्व गोष्टी सहजपणे करता येतात. वर्षभरात व्यक्तीला साधारणपणे ४ ते ५ इंच पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा! पोटाचा घेर नक्की कमी होऊन आपले आरोग्य हमखास सुधारेल!



सुटलेलं पोट कमी करण्यासाठी प्रभावी ५ योगासनं potache vyayam in marathi

vajan kami karne marathi tips

वजन कमी करण्याठी योग हा सर्वात महत्वाचा आणि साधा उपाय मानला जातो, योगमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो, गर्भवती महिलांना देखिल काही गोष्टीत काळजी घेऊन योग करण्याचा सल्ला दिला जातो.

तणावामुळे माणसामागे अनेक रोग लागतात. योग केल्याने वजन घटते. तुम्ही फिट राहतात आणि तुमचा आत्मविश्वास देखिल वाढतो.

तणावामुळे अनेक आजार वाढतात, मात्र योगाच्या माध्यमातून यातून निश्चितच फायदा होतो. आजारपण दूर ठेवता येतं. खाली काही आसनं देण्यात आली आहेत. ज्यामुळे नेहमीच वजन कमी करण्यात मदत होत असते.

वक्रासन

पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा व शरीराच्या जवळच उभे करा व दोन्ही पायांमध्ये खांद्याएवढे अंतर ठेवा.

दोन्ही हात उचलून तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याच्या व उजवा हात उजव्या खांद्याखाली सरकवा.

श्‍वास घेत घेत हळुवार खांदे वर उचला. मान सैल सोडा, हात कोपरात व पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत कंबर वर उचला. श्‍वसन संथ चालू ठेवा.

फायदे
आपण व्यवहारात नेहमी पुढे वाकत असतो. त्यामुळे पाठीचा कणाही नेहमी पुढच्या दिशेने अधिकाधिक वाकविला जातो. त्याच्या अगदी नेमकी उलट अवस्था या आसनात होते. त्यामुळे पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढायला या आसनाचा निश्‍चित उपयोग होतो. पोटाचे, मांड्यांचे, पोटर्‍यांचे स्नायू कार्यक्षम होतात.

दक्षता
पाठीच्या कण्याचे विकार असणार्‍या रुग्णांनी हे आसन मार्गदर्शनाशिवाय करू नये.
********
भुजंगासन
जमिनीवर पालथे झोपून पाय सरळ ठेवा. पायाची बोटे आणि कपाळ जमिनीला स्पर्श करतील असे झोपा.

दोन्ही पाय जुळवून घ्यावेत, तुमची दोन्ही पाउले आणि टाचा एकमेकाला हळूवारपणे स्पर्श होतील याची खात्री करून घ्या..

हाताचे तळवे जमिनीवर ठेवून खांद्याखाली घ्या. हाताची कोपरं शरीराला लागून व समांतर असावेत.

एक दिर्घ श्वास घेऊन हळूवारपणे डोके, छाती व पोट वर उचला, पण तुमची नाभी जमिनीवरच असू द्यात.

आता, हातांचा आधार घेत तुमचे शरीर जमिनीपासून उचलून मागे टाचेकडे खेचा.
लक्षात ठेवा: तुमच्या दोन्ही तळहातांवर सारखेच वजन असू द्यात
पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत, सजग राहून श्वास घेत राहा. जास्तीतजास्त मागे ताणून तुमचे हात सरळ राहतील असा प्रयत्न करा. आता डोके मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असे पहा.

लक्षात ठेवा: तुमचे कान तुमच्या खांद्यांपासून दूर आहेत का? खांद्यांना आराम द्या. हाताची कोपरं थोडे वाकवले तरी चालतील. सरावाने तुम्हाला कोपरं सरळ ठेऊन आसनस्थिती सुधारता येईल.

तुमचे पाय अजूनही जुळलेले आहेत ना याची खात्री करा. चेहऱ्यावर स्मित कायम ठेवत श्वास घेत राहा.

आसनस्थितीत प्रमाणाबाहेर जास्त वेळ राहू नका व सहन होईल एवढाच ताण द्या.
श्वास सोडत आपले पोट, छाती व डोके जमिनीवर टेकवा.

भुजंगासनाचे फायदे

खांदा व मानेला मोकळे करते.
पोट पुष्ट करते.
संपूर्ण पाठ व खांदे सशक्त बनवते.
पाठीच्या मधल्या व वरील भागांना लवचिक बनवते.
छाती विस्तारते.
रक्ताभिसरण सुधारते.
थकवा व तणाव कमी करते.
श्वसनमार्गाचे विकार जसे दमा असलेल्या लोकांना फारच उपयुक्त. (परंतू खोकल्याची उबळ आली असता हे आसन करू नये).
भुजंगासन केंव्हा करू नये

गरोदरपणात, छातीचे अथवा मनगटाचे हाड मोडल्यास, किंवा नुकतीच एखादी पोटाची शस्त्रक्रिया, जशी हर्निया, झाली असल्यास हे आसन करू नये
तुम्हाला कार्पेल टनेल सिंड्रोमचा त्रास होत असेल तर भुजंगासन करू नका.
जुन्या आजारात किंवा पाठीच्या कण्याच्या विकारात हे आसन फक्त श्री श्री योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.
**********
धनुरासन
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात.
या आसनात शरीराची अवस्था धनुष्याप्रमाणे होते म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात. पाठीला किंवा कण्याला गंभीर विकार झाले असतील तर हे आसन करू नये. अल्सर, कोलायटीससारखे पोटांचे विकार असलेल्यांनी हे आसन टाळावं. छातीवर झोपावं.

दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावेत आणि सहा ते सात इंच एकमेकांपासून दूर करावेत.
दोन्ही हातांनी पायाच्या घोटयाजवळ पकडावं.
आता श्वास घ्यावा आणि हातांनी पाय व पायांनी हात ओढून वर उचला. संपूर्ण शरीर वर उचला आणि ताणलं जाऊ द्या.
पाय वर उचलताना पोटऱ्या मांडयापासून लांब नेण्याचा प्रयत्न करा. शरीराची आकृती ताणलेल्या धनुष्यासारखी होईल.
अशा स्थितीत किमान १० ते ३० सेकंद राहा. श्वास संथगतीने सुरू राहू द्या.
या स्थितीत असताना हाताची पकड जास्तीत जास्त वर घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच शरीराचा सगळा भार पोटावर येईल.
पूर्वावस्थेत येताना, श्वास सोडत सोडत, गुडघे, खांदे, हनुवटी हळूहळू जमिनीवर टेकवा.

गुडघ्यात पाय हळूहळू सरळ करा, गुडघे सरळ केल्यावर पूर्वस्थितीला या. थोडया वेळ शरीर शिथिल करा.
फायदा
या आसनामुळे शरीराचे स्नायू दृढ आणि लवचिक होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोट, पाठ, मान, छाती, हात, पाय यांसारख्या अवयवांना एकचवेळी उत्तम आणि योग्य ताणाची स्थिती मिळाल्याने, शरीराला होणारा लाभ वृद्धिंगत होतो. तसंच पाठीचा वक्रदोष नष्ट होतो. कमरेची आणि मानेची दुखणी कमी होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटांचे स्नायू खेचले गेल्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते. तसंच पाठीचा मणका विशेषत: कुठल्याही दिनचर्येच्या कामात धनुष्याप्रमाणे असा ताणला जात नाही, तो या आसनामुळे ताणला जातो. म्हणून मणक्याची गादी सरकणं, मणके झिजणं आणि कमरेचे स्नायू जखडणं या व्याधींवर अत्यंत लाभदायी म्हणजे हा आसन प्रकार आहे.
****************************************
पश्चिमोत्तानासन
पश्चिम या शब्दाचा अर्थ पाठीकडची बाजू असाही होतो. या आसनात पायाच्या घोट्यापासून मस्तकापर्यंतचा पाठीचा भाग ताणला जातो. म्हणून याला ‘पश्चिमोत्तानासन’ असं सार्थ नाव दिलेलं आहे.

कृती
सपाट जमिनीवर पाय पसरून बसावं.
पायाचे अंगठे आणि टाचा एकमेकांना जोडून ठेवावेत.
मान सरळ आणि समोर असावी.
कमरेत वाकून हात पावलांकडे न्यावेत. दोन्ही हातांच्या तर्जनींना हुकाप्रमाणे आकार द्यावा व त्या त्या बाजूकडील पायांचे अंगठे अडकवावे.
कमरेपासून वरचे शरीर व हात ढिले करावेत. म्हणजे शरीर पुढे व खाली झुकू शकेल. कोप-यामध्ये हात वाकू लागतील. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. मात्र डोकं गुडघ्याला टेकवू नये किंवा पायदेखील वर करू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे झुकावे.
संथ श्वास चालू ठेवावा.
थोडा वेळ याच स्थितीत बसावं.
हळूहळू हाताची पकड सोडत पूर्वस्थितीत यावं.

फायदे
शरीराच्या पाठीकडील बाजूचे स्नायू, विशेषत: मांडीच्या मागील आणि कमरेचे स्नायू जास्त लवचिक बनवतात.
पाठीच्या कण्यावरील ताणामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारतं व मणक्यांतून निघणा-या नाड्या (मज्जातंतू) अधिक कार्यक्षम बनतात.
खुरटलेली उंची वाढवण्यास या आसनाचा उपयोग होतो.
पोटावर, विशेषत: ओटीपोटावर घनदाब निर्माण झाल्याने तेथील मेद कमी होतो.
तरुण वयात निर्माण होणारे वीर्यदोष व तरुण स्त्रियांना जाणवणारा मासिक पाळीच्या अतिरिक्त स्त्रावाचा त्रास या आसनाच्या सरावानं नाहीसा होतो.
सायटिका, पाठीची व कमरेची इतर दुखणी या आसनाच्या योग्य व नित्य अभ्यासाने दूर होतात. पचनक्षमता सुधारते.
***********************************
चक्‍की चलनासन
योगचं हे आसन पोटाची चर्बी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या योगात वजन कमी करण्यात मोठी मदत होते. पहिल्यांदा जमीनवर तुम्ही आरामत बसा, या दरम्यान तुमचे पाय सरळ पसरवा. दोन्ही पाय एकमेकांना लागून असले पाहिजेत, याचं भान ठेवा आणि गुडघ्यांना न वाकवता गोलाकार आकारात फिरवा. दहा वेळेस या आसनाला घड्याळ्याच्या दिशेने फिरवा आणि काही वेळाने घड्याळ्याच्या विरूद्ध दिशेने फिरवा, आणि नंतर सोडून द्या.'

============

नैसर्गिक रित्या वजन घटवायचे आहे का?


हे अगदी सहज शक्य आहे, त्या साठी रात्रीची झोप उडवायची गरज नाही.

“मला वाटते की माझं वजन खूप वाढलं आहे आणि मला बारीक व्हावचं लागेल.” ह्या एका विचाराचे रुपांतर काहीही करून वजन घटवण्याचे उपाय शोधण्यामध्ये होते.

शरीर सुडौल राखण्यासाठी व्यायामशाळेत तासंतास व्यायाम करणे, जिभेवर ताबा ठेवत मिळमिळीत अन्नाची सवय लावणे असे अनेक उपाय आपण करून बघितले असतीलच. पण समजा तुम्हाला एक नैसर्गिक, दुष्प्रभाव नसलेला, अत्यंत सुलभ आणि १५-२० मिनिटं घेणारा उपाय मिळाला तर कसं राहील?

ध्यानसाधना; अतिशय सुलभ पण अत्यंत प्रभावी तंत्र. ध्यानसाधना तर मन शांत करण्यासाठी असते, मग त्याचा वजन कमी करण्याशी काय संबंध, असा विचार मनात येतोय का? ते कसं शक्य आहे ते पुढे पाहू या........


#१ सहजपणे बीएमआर कमी करा:

जर तुम्ही वजन घटवण्याच्या “मोहिमेवर” असाल तर नियमितपणे BMR *(Basal Metabolic Rate) म्हणजेच  खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याची गती) तपासण्याची गरज असते. तुम्हाला तुमच्या शरीराचा BMR माहित असेल तर तुम्ही तुमच्या जेवणातील कॅलरिज कमी करू शकता जेणेकरून वजन आपोआप नियंत्रित राहील. ध्यान केल्याने तुमचे BMR आपणहून कमी होते. म्हणजेच अतिरिक्त कॅलरिज घेण्याचे प्रमाण आपसूकच कमी होते ज्यामुळे वजन आपोआपच कमी हेते.

#२ तुमच्या व्यामाची सवय शिस्तबद्ध असू द्या:



तुमच्या लक्षात आले असेल की जर तुम्ही काही दिवस व्यायाम केला नाहीत तर लगेच तुमचे वजन पुन्हा वाढू लागते. ह्याचे कारण, तुम्ही जेवढं जेवता तेवढ्या कॅलरिज जाळत नाही. व्यायाम केल्याने फक्त तुमची भूक वाढते पण अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होत नाही.

योगाभ्यास केल्याने अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते व जड असलेले अन्न सेवन करण्याची रुची कमी होते. म्हणजेच भूक तर लागते पण थोडेसे खाउन तृप्ती येते. ह्याचा दीर्घकालीन परिणाम असा होतो की तुम्ही काही दिवस व्यायाम सोडला तरी वजन लगेच वाढत नाही.

#३ तुमचा समतोल पुनर्स्थापित करा


अवाजवी वजन वाढणे किंवा कमी होणे हा होरमोन्स (संप्रेरक) असंतुलित झाल्याचा परिणामही असू शकतो. ध्यानसाधना केल्याने शरीरातील सर्व प्रणालींचा ताळमेळ जमून येतो. परिणामी तुम्ही स्थूल असाल तर वजन कमी करता येते किंवा तुमचे वजन कमी असेल तर ते वाढवता येते.

#४ चटक खाणे कमी करा

वजन घटवण्यात सगळ्यात मोठा अडसर म्हणजे लज्जतदार पदार्थ खाण्याची लागलेली चटक. एखाद्या मिठाईच्या दुकानाजवळून जाताना आसपास दरवळणाऱ्या गोड वासामुळे तो पदार्थ घेऊन खाण्याचा मोह आवरत नाही. पण नियमित ध्यान केल्याने मनावर ताबा ठेवणे थोडं सोपं होतं.

ध्यान केल्याने सजगता वाढते, आपल्याच खाण्या पिण्याच्या सवयींबाबत सतर्कता वाढते. मग पुन्हा कधीही तुम्ही चॉकलेट किवां चिप्स घ्यायला जाल तेव्हा तुम्ही सतर्क व्हाल की हे खाल्ल्याने माझे वजन वाढेल. मग त्याऐवजी तुम्ही दुसरे काही तरी पौष्टिक पर्याय शोधाल. काही कालांतराने नियमित ध्यान केल्याने तुमच्या इच्छा नाहीशा होतात. मग तुम्ही ते चिप्स किंवा चॉकलेट घेण्यास कधीच जाणार नाहीत.

दिव्या सचदेव म्हणतात: “गेल्या एका वर्षापर्यंत मला चॉकलेट खाण्याची इतकी सवय होती की दिवसातून एक तरी चॉकलेट खाल्ले नाही तर मी अस्वस्थ व्हायचे. माझं वजन भरपूर वाढत होतं पण ह्या सवयीचा त्याग कसा करावा तेच कळत नव्हते. पण दोन महिने नियमित ध्यान केल्याने चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा / वासना / लालसा कमी झाली.  मी नियमीतपणे ध्यान करणे चालू ठेवले आणि माझं वजन ७ किलोनी कमी झालं”.

# ५ आपला संकल्प मजबूत असू द्या:

आपली  वजन कमी करण्याची मोहीम अर्धवट सोडून देणे किती सोपे असते माहित आहे का?  अतिनिद्रा, अरबट चरबट खाणे व गोड पदार्थ ह्यांचा तुमच्या मोहिमेवर परिणाम सहज होऊ शकतो. ही तुमच्या संकल्प शक्तीची परीक्षा ठरू शकते. इथेही ध्यानाचा फायदा नक्कीच होऊ शकतो. ध्यान केल्याने तुमची संकल्प शक्ती वाढते ज्यामुळे व्यायाम करणे, हलका सुपाच्य आहार घेणे व चांगल्या सवयी ठेवण्या प्रतीची प्रतिबद्धता वाढते.

ध्यान केल्याने आपले संकल्प पूर्ण करण्याची शक्ती मिळते.

मयंक ठक्कर म्हणतात: “ध्यान केल्याने अंत:शक्ति आणि इक्छा शक्ति मिळते ज्याच्यामुळे रोज व्यायाम करण्यासाठी मी प्रतिबद्ध राहू शकतो.”

#६ भरपूर भाज्या खा आणि तणाव दूर ठेवा

ज्या वेळेस तुम्हाला चॉकलेट किंवा इतर अरबट-चरबट खाण्याची इच्छा होईल, तेव्हा तुम्ही थोडा विचार करा की मी हे का खात आहे? घरचा किंवा कामावरचा काही तणाव विसरण्यासाठी मी हे खात आहे का? मनातील तणावामुळेही वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा होत राहते. ह्यामुळे थोडा फार तणाव निवळतो पण ध्यान केल्याने खोलवर जमा झालेला तणाव नैसर्गिकरीत्या निवळू लागतो. ध्यान करणे ही नैसर्गिकरीत्या तणाव निवारणाची व त्याच बरोबर वजन नियंत्रित ठेवण्याची उत्तम पद्धत आहे.

कोमल कौर म्हणतात, “पूर्वी जेव्हा माझ्या बॉय फ्रेंडशी माझं भांडण व्हायचं त्या वेळेस तणाव दूर करण्यासाठी मी वाजवी पेक्षा जास्तं खायचे. पण माझ्या वजन कमी करण्याच्या मोहिमेत जेव्हापासून सुदर्शन क्रिया आणि ध्यानाला समाविष्ट केलं, तेव्हापासून चित्र बदललं. ह्याचं कारण की परिस्थिती कशीही असली तरी मी शांत राहू लागले आणि तणाव घालवण्यासाठी जास्तं खाणं कमी झालं, वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली.

#७ वजन कमी करण्यासाठी वेळ देण कठीण होतेय का?

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामाला वेळ देता येत नसेल तर ध्यान करणे हा रामबाण उपाय ठरू शकतो. ‘ध्यान केल्याने दिवसभरात जास्तं वेळ मिळू लागेल ! . आणि ध्यान करण्यासाठी फक्त १५-२० मिनिटं लागतात. दिवसभरात तेवढा वेळ काढणे सहज शक्य आहे नाही का?  तुमच्या शरीराला तेवढा वेळ देणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तुमची कार्यक्षमता प्रचंड वाढते, ह्याचा परिणाम म्हणजे तुम्ही कोणताही काम लवकर आटपू शकता. परिणामी वजन घटवण्याच्या मोहिमेला जास्तं वेळ देऊ शकाल.

#८ स्वत:चेच लाड करा (लाडके बना)


विचित्र वाटतंय? पण प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा आपणच आपला लट्ठपणा स्वीकारलेला आहे तर मग वजन कमी करण्याची गरजच काय? ह्याचं उत्तर असं की अशी स्वीकृती आली की मन शांत होते आणि चिंता करणे थांबते. अशा मनस्थितीमुळे वजन कमी करण्याकडे जास्तं लक्ष देता येते, आणि तुम्ही केलेले प्रयत्न जास्तं परिणामकारक ठरतात.

सूचना: प्रत्येकाची शरीर बांधणी वेगळी असते त्यामुळे योग-ध्यान केल्याने त्याचा प्रत्येकावर होणारा परिणाम वेगवेगळा असू शकतो, भिन्न अनुभव असू शकतात. म्ह्णूनच आपल्या अनुभवाची तुलना दुसऱ्याच्या अनुभवाशी करू नये. संयम राखा, ध्यान म्हणजे जादूची कांडी नव्हे ज्याचा परिणाम लगेच दिसून येईल. रोज अभ्यास / सराव केला तर नक्की फरक जाणवेल.
============

आता सुधारित यादी खाली पहा:

कमी कॅलरीयुक्त समतोल आणि पोषक आहार कसा असतो?

    सकाळी ६ वा. १ कप चहा (४ पार्ले-जी बिस्किटे बाद) (60 कॅलरीज )
    सकाळी १० वा. आॅफिसमध्ये दोन इडल्या (वडापाव बाद)(120 कॅलरीज )
    सकाळी ११.३० वा. १ कप चहा (60 कॅलरीज )
    दुपारी लंच साठी:
        ३ पोळ्या (चपात्या) (१ पोळी कमी)(300 कॅलरीज )
        १ भाजी (१ भाजी कमी) (७५ कॅलरीज )
        १ वाटी डाळ (80 कॅलरीज )
        १ मूद भात (80 कॅलरीज )
        तळलेला पापड बाद (0 कॅलरीज )
        १ वाटी दही (80 कॅलरीज )
        गुलाबजाम किंवा २ जिलब्या बाद (0 कॅलरीज )
    दुपारी ३.३० वा. १ कप चहा (60 कॅलरीज )
    सायंकाळी ५ वा. १ वडापाव (१ वडापाव बाद) आणि १ कप चहा (210 कॅलरीज )
    सायंकाळी ७ वा. १ कप चहा (५० ग्राम फरसाण बाद) (60 कॅलरीज )
    रात्री डिनरसाठी:
        ३ पोळ्या (चपात्या) (१ पोळी कमी)(300 कॅलरीज )
        १ भाजी (१ भाजी कमी) (७५ कॅलरीज )
        १ वाटी डाळ (80 कॅलरीज )
        १ मूद भात (80 कॅलरीज )
        तळलेला पापड बाद (0 कॅलरीज )
        १ वाटी दही (80 कॅलरीज )
        १ केळे (100 कॅलरीज )

एकंदर: १९०० कॅलरीज. सुधारित यादीनुसार पूजा दिवसभरात 1900 कॅलरीजचा आहार घेते. १९०० कॅलरीज म्हणजे २७०० पेक्षा ३० टक्क्यांनी कमी आहेत.

अशाच प्रकारे तुम्ही तुमची सुधारित यादी घरच्या घरी बनवू शकाल
कमी कॅलरीयुक्त समतोल आणि पोषक आहार यांपासून बनवा

    जास्त चोथायुक्त पदार्थ

    डाळी / कडधान्यं: छोले, वाटाणे, हरभरे, डाळ, उसळ इ.
    मोड आलेली कडधान्यं (मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.)
    हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी
    पपई, पेरू, बोरे, कलिंगड, नाशपाती, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळे
    आख्खी कडधान्ये- उदा. मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.
    कुरमुरे, भाजलेले चणे, मक्याचे कणीस, ओला हिरवा मटार इ.
    गहू, बाजरी, ज्वारी यांच्या पिठांच्या पोळ्या/भाकऱ्या
    पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या
    पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या रव्याची खीर किंवा उपमा
    व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच

खालील पदार्थ टाळा:

    गूळ किंवा साखर (अगदी मध सुद्धा) घातलेले सर्व पदार्थ
    कोकाकोला, पेप्सी, मिरिंडा, मॅंगोला, लिम्का यांसारखे सर्व कोल्ड्रिंक्स
    तळलेले सर्व पदार्थ
        फरसाण: बाकरवडी, शेव, तळलेला चिवडा, चकली, गाठिया इ.
        सर्व प्रकारची भजी: कांदाभजी, बटाटा-भजी, गोल भजी इ.
        वडे, सामोसे, मेदूवडे, दहीवडे इ.
        मिसळ आणि मिसळ-पाव
        शंकरपाळी, जिलेबी, बर्फी, पेढे, गुलाबजाम, लाडू, वगैरे मिठाया
    सर्व बेक केलेले पदार्थ (बेकरी प्रोडक्ट्स):
        बिस्किटे: ग्लुकोज, गुड-डे, २०-२० इ.
        सर्व प्रकारचे केक, नानकटाई, खारी, इ.
    साबुदाणा, मैदा,रवा, खवा (मावा) यांपासून बनविलेले सर्व पदार्थ
    पांढरा भात, बटाटा, रताळे कमी प्रमाणात कमी वेळा खा.
    पिकलेले आंबे, चिकू, केळी प्रमाणात खा.

खालील पदार्थ खायला हरकत नाही:

    कुरमुरे चिवडा (न तळलेला असावा)
    पोहे, इडली, कमी तेल/लोणी असलेला डोसा (low fat dosa)
    व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच(कमी लोणी असलेले (low fat sandwich))
    भाजके चणे
    भाजलेले मक्याचे कणीस
    उकडलेले हिरवे वाटाणे

pot kami karnyasathi upay marathi

vajan kami karne marathi tips

vajan kami karne ke upay marathi

pot kami karnyache upay

vajan kami karayche gharguti upay

vajan kam karne ke tips

vajan kami karnyasathi kay karave

potache vyayam in marathi

vajan kami karne ke upay marathi

surya namaskar

vajan kami karayche gharguti upay

vajan kami karnyasathi kay karave

vajan kami kara

vajan kam karne ke tips

vajan kase kami karave

charbi kami karne upay in marathi

vajan kami karnyasathi kay karave

vajan kami karayche gharguti upay

vajan kami karne ke upay marathi

vajan kam karne ke tips

vajan kami kara

vajan kami karnyache upay in hindi

vajan kam karne ke upay marathi

potache vyayam in marathi

Wednesday, September 28, 2016

5:50 PM

चिकन फ्राय मराठी रेसिपी chicken fry recipes in marathi

चिकन फ्राय

अगदी सुटसुटीत आणि तेवढ्याच चवीने खाणाऱ्यांसाठी हा स्पेशल पदार्थ आहे. सोबत तांबडा-पांढरा रस्सा असेल आणि ग्रेव्हीची गरज नसेल तर चिकन फ्रायसारखा चविष्ट पदार्थ दुसरा नाही.

साहित्य : एक किलो चिकन, आले लसूण पेस्ट, मिरची पूड, हळदपूड, गरम मसाला, फोडणीसाठी खडा मसाला, फोडणीसाठी तीन पळ्या तेल, हिंगपूड, धने, जिरे भाजून पूड, मीठ.

कृती : सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. त्याला आले, लसूण पेस्ट, मिरचीपूड, हळदपूड, गरम मसाला पूड, धने जिरे पूड असे सर्व लावून मेरिनेट करून लावून किमान अर्धा तास ठेवावे व मुरू द्यावे. नंतर एका रुंद पातेल्यात तेल घालून तापवावे. तेल तापले की त्यात पाव चमचा हिंग पूड घालावी. त्यावर खडा मसाला टाकावा व मेरिनेट केलेले चिकन टाकून झाकण ठेवून चांगले परतावे व त्यावर पाणी ठेवावे. मंद जाळावर चांगले शिजू द्यावे. अधूनमधून परतावे व चांगली वाफ काढावी. खाली लागू देऊ नये. चांगले शिजवावे व नंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. कडेने उकडलेल्या अंड्यांच्या चकत्या ओळीने लावा. त्यातील मधल्या पिवळ्यावर बरीक चिरलेली हिरवी कोथिंबीर थोडी थोडी घालावी. त्यामुळे ते डेकोरेटिव्ह होते. त्यानंतर ते सर्व्ह करावे. हे चिकन अतिशय स्वादिष्ट लागते. ते चपाती, पराठा किंवा फुलक्यांबरोबर चांगले लागते. आवडत असल्यास लिंबू पिळून घ्यावे. मिरची पूड ऐवजी नेहमीचा मसाला घातला तरी चालेल.

chicken fry recipes in marathi

चिकन फ्राय कृती

चिकन 65 बनाने की विधि

चिकन फ्राई बनाने की विधि

चिकन फ्राई रेसिपी

चिकन चिली

चिकन रस्सा मराठी

चिकन कोरमा

चिकन मसाला मराठी
5:47 PM

maka recipe in marathi



मक्याचे गुलाबजाम Maka Gulabjam

साहित्य : १ वाटी कोवळ्या पांढऱ्या कणसाचा गर, १ वाटी मावा, २ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर, चिमुटभर बेकिंग पावडर, साखर दीड वाटी, रोझ इसेन्स, वेलची, जायफळ पूड थोडंसं केशर.

कृती : प्रथम कणसं किसून त्याचा गर घ्यावा. त्यात १ वाटी मावा (किसून) आणि दान मोठे चमचे कॉर्न फ्लोअर, किंचित मीठ, चिमुटभर बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने एक जीव करावं आणि त्याचे छोटे छोटे लांबट गोळे करून तुपात तळून घ्यावेत. दीड वाटी साखरेत अधीर् वाटी पाणी घालून पाक तयार करावा. पाकात वेलची, जायफळ पूड, केशर आणि रोझ इसेन्स घालून त्यात तळलेले गुलाबजाम घालावेत. किमान एक तासभर पाकात मुरू द्यावेत नंतर गरम अथवा थंड खाण्यास द्यावेत.



.............

मक्याचे शाही मोदक Maka Shahi Modak

साहित्य : १ वाटी अमेरिकन मक्याच्या कणसाचे दाणे, पाव वाटी दूध, अधीर् वाटी साखर, साजूक तूप (अधीर् वाटी), २ ते ३ चमचे खवा, वेलची पूड, रवा, पिवळा रंग, काजू, बदाम बारीक करून.

कृती : प्रथम मक्याचे दाणे दूध घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. कढईमध्ये प्रथम खवा भाजून घेऊन नंतर तूप टाकून त्यात बारीक केलेला मका घालावा. मंद आंचेवर चांगला खमंग भाजावा. नंतर एका भांड्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल एवढं पाणी टाकावं आणि एक तारी पाक करावा. नंतर त्या पाकामध्ये मका आणि खवा मिसळावा. हे मिश्रण गॅसवर जरा घट्ट होईतोवर ढवळावं नंतर खाली ऊतरवून त्यात वेलची पूड, काजू, बदामची भरड आणि रवा, रंग घालून ढवळावं आणि थंड होऊ द्यावं. थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यातून मोदक करावेत आणि आपल्या आवडीनुसार सजावट करून र्सव्ह करावं.



..............

मका इडली Maka Idali Recipe

साहित्य : मका एक वाटी, रवा अधीर् वाटी, पनीर अर्धा कप, दूध अधीर् वाटी, २ चमचे तेल, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, बेकिंग पावडर, फोडणीसाठी मोहरी.

कृती : रवा भाजून थंड करायचा. मका किस, पनीर आणि दूध (मोहरी तुपात फोडणीला द्यायची), नंतर बेकिंग पावडर (पाण्यात विरघळवलेली) आणि चवीपुरतं मीठ घालावं. हे सर्व एकत्र करून त्यात रवा घालावा. नंतर इडली पात्राला तेल लावून त्यात हे मिश्रण घालून १५ मिनिटं आंच्ेवर ठेवावी. छानपैकी इडली तयार. नंतर खोबऱ्याच्या चटणीसोबत ही इडली र्सव्ह करावी.



baby corn recipe in marathi language

corn bhaji recipes in marathi

corn tikki recipe in marathi

corn recipes indian in marathi

baby corn bhaji recipe in marathi
5:43 PM

kek recipe in marathi language





केक किंवा पेस्ट्रीज बघितल्या की, तोंडाला पाणी सुटतं. सध्या रेड व्हेलव्हेट सारख्या पेस्ट्रीज लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या स्टाइलचे म्हणजेच कप केक, पॅनकेक हिट ठरतायत. यामध्ये भर पडली आहे ती मग केकची. स्टायलिश मगमध्ये बनवायच्या चवदार केकच्या काही रेसिपीज खास तुमच्यासाठी...

चॉकलेट मग केक Chocolate mag cake

साहित्य ingredients- पाव कप मैदा, २ मोठे चमचे कोको पावडर, १ चिमूट बेकींग पावडर, २ मोठे चमचे साखर, १ चिमूट मीठ, दीड कप दूध, २ मोठे चमचे तेल

  कृती-सर्वात प्रथम मैदा, कोको पावडर, बेकींग पावडर, साखर, मीठ एकत्र करा. त्यामध्ये दूध आणि तेल घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. मिश्रणामध्ये एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या. मायक्रोवेव्हसाठी योग्य अशा मगमध्ये मिश्रण ठेऊन ७० सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुमचा चॉकलेट मग केक खाण्यासाठी तयार.

गाजराचा मग केक Carrot mug cake

साहित्य ingredients- पाव कप मैदा, १ चमचा साखर, अर्धाचमचा दालचिनी पावडर, १ चिमूट जायफळ पावडर, अर्धा चमचा बेकींग पावडर, चिमूटभर मीठ, १ चमचा नारळाचं तेल, १ मोठा चमचा दूध, १ खिसलेलं गाजर

कृती- मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यासाठी योग्य अशा मगमध्ये मैदा, साखर, दालचिनी पावडर, जायफळ पावडर, बेकींग पावडर, मीठ एकत्र करुन घ्या. हे सगळं मिश्रण तेल आणि दूध घालून एकजीव करुन घ्या. सर्वात शेवटी खिसलेलं गाजर घाला आणि हे मिश्रण साधारण ९० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.

ब्लू बेरी मग केक Blue berry mag cake

साहित्य ingredients- २ मोठे चमचे बटर, अडीच चमचे साखर, २ मोठे चमचे दूध, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा चमचा बेकींग पावडर, १ मोठा चमचा मैदा, ७-८ ब्लू बेरीज

कृती- सर्वात प्रथम बटर, साखर, दूध, व्हॅनिला इसेन्स हे सगळं एकत्र करा. नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर आणि मैदा घाला. सर्वात शेवटी त्यामध्ये ब्लू बेरी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण एका मगमध्ये घालून सेट करा. मात्र हे मिश्रण अर्धा मगच भरा. कारण केक बनून तो थोडा फुलतो. हे मिश्रण साधारण ९० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि अशाप्रकारे तुमचा केक तयार.

फनफेटी मग केक funfeti mag cake

साहित्य ingredients - पाव कप मैदा, २ चमचे साखर, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा बेकींग पावडर, पाव कप नारळाचं दूध, दीड कप नारळांचं तेल, २ चमचे स्प्रिंकल्स

कृती- सर्वात प्रथम मैदा, साखर, मीठ आणि बेकींग पावडर एकत्र करुन घ्या. यामध्ये हळूहळू दूध आणि तेल घाला. मिश्रण एकजीव होईपर्यंत एकत्र करत राहा. शेवटी मिश्रणात स्प्रिंकल्स घाला. मिश्रण साधारण ८०-९० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. केक तयार झाल्यावर त्यावर गार्निशिंगसाठी स्प्रिंकल्स घाला.

टीपः मायक्रोवेव्हमध्ये मग केक बनण्यासाठी साधारण ५० ते ९० सेकंद लागतात. जर ते केक व्यवस्थित न भाजल्यास १५ सेकंद आणखीन ठेवा.


kek recipe in marathi language

chocolate cake recipe in marathi language

veg cake recipe in marathi language

eggless cake recipe in marathi language

biscuit cake recipe in marathi language

cake recipes in marathi language book

healthy cake recipes marathi language

cake recipes in marathi language without oven

cake recipes in marathi language without oven video
5:29 PM

Sevai Upma recipe in marathi


Sevai Upma Recipe

साहित्य Ingredients - १ कप शेवया, २ कप गरम पाणी, १/२ कप मटारचे दाणे, १-२ हिरव्या मिरच्या, किसलेलं बीट, किसलेलं गाजर, घेवडा, फ्लॉवर, सिमला मिरची, मक्याचे दाणे (आवडीनुसार भाज्या), चवीप्रमाणे मीठ, साखर, १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग.

कृती - तेल न घालता शेवया कढईत थोड्या लालसर रंगावर भाजून घ्याव्यात. त्या बाजूला काढून ठेवून त्याच कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा. मोहरी थोडी तडतडली की त्यात उडीद डाळ घालून तांबूस रंगावर भाजू द्यावी. त्यातच मिरची घालावी. त्यावर मटारचे दाणे घालून बारीक गॅसवर २-३ मिनिटं परतावं. त्यावर भाजलेल्या शेवया घालाव्यात व २-३ मिनिटं परतावं. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून वरून दीड कप गरम पाणी ओतावे. मिश्रण नीट हलवून झाकावे. शेवया शिजल्या नाहीत आणि पाणी आटले तर उरलेले पाणी घालून पुन्हा झाकून ठेवावे. शेवया जरा फुलल्यासारख्या वाटल्या की झाकण काढून ठेवावे. त्यावर लिंबाचा रस आणि साखर घालून नीट मिसळावे. उरलेले पाणी आटवून टाकावे. शेवया नीट शिजून मोकळी होण्यासाठी त्यात अर्धा चमचा साजूक तुपाची धार सोडावी, म्हणजे प्रत्येक शेवयी सुटी होते. आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा फोडणीत घातला तरी हरकत नाही.
========

 साहित्य:
१/२ कप रवा
सव्वा ते दिड कप पाणी
१/२ कप कांदा बारीक चिरुन
१ टेस्पून तेल किंवा २ टिस्पून तूप
फोडणीसाठी : १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग
२-३ मिरच्या बारीक चिरुन
३-४ कढिपत्त्याची पाने
१/४ टिस्पून किसलेले आले
१/२ टिस्पून उडीद डाळ
३-४ काजू बी (ऑप्शनल)
चवीनुसार मीठ
१ टिस्पून साखर
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ टिस्पून लिंबूरस

कृती:
१) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
२) मध्यम आचेवर कढईत तेल/तूप गरम करून त्यात मोहोरी, जीरे, हिंग, आले, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ लालसर झाली कि कढिपत्ता, मिरच्या, काजू घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा परतून घ्यावा. आवडत असल्यास टोमॅटोच्या ४-६ फोडी घालाव्या.
३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर घालावी. त्यामुळे उपम्याला मीठ व्यवस्थित लागेल.
४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे. १ मिनिटाने उपम्याची चव बघून मीठ adjust करावे. वाफ काढावी.
५) उपमा तयार झाला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे.

टीप :
१) काही जणांना उपमा अगदी मऊसर लागतो त्याप्रमाणे अर्धा वाटी गरम पाणी जास्त घालावे.
२) उपम्यावर बारीक शेवसुद्धा छान लागते.
========


आवश्यक सामग्री - Ingredients for Rava Upma

    सूजी - 150 ग्राम (1 कप)
    तेल - दो टेबल स्पून
    मुगफली के दाने - 50 ग्राम (1/3 कप)
    राई के दाने - एक छोटी चम्मच
    उरद दाल - 2 छोटे चम्मच
    हरी मिर्च - 2 य 3 बारीक कटी हुई
    अदरक - 1 इंच टुकड़ा (छोटा छोटा काट लीजिये)
    हरी मटर के दाने - आधा कटोरी
    गाजर - एक छोटी कटोरी कतरी हुई
    घी - 1 टेबल स्पून
    हरा धनियाँ - 50 ग्राम बारीक कटा हुआ
    हरा नरियल - 1टेबिल स्पून कद्दूकस किया हुआ
    नमक - स्वादानुसार (1 छोटी चम्मच)

बनाने की बिधि - How to make Rava Upma

सबसे पहले मूगफली के दानों को भून कर छील लीजिये या बाजार से भुने हुये दाने लेकर उनका छिलका उतार कर, किसी प्याले में रख दीजिये.

सूजी को सूखी कढ़ाई में हल्का भूरा होने तक चलाते हुये भूनिये. भुनी सूजी को किसी प्लेट में निकाल लीजिये.

कढ़ाई मे घी डाल कर गरम करिये. राई के दाने डाल दीजिये, दाने कढ़कढ़ाहट के साथ भुनने लगेगे, उरद दाल डालिये, दाल के दाने हल्के ब्राउन होने के बाद मूंगफली के दाने डालकर हल्का सा भूनिये, हरी मिर्च और अदरकर डाल कर थोड़ा सा भूनिये. मटर के दाने और कटे हुये गाजर भी डाल दीजिये, सब्जियों को 2-3 मिनिट तक भूनिये. इसके बाद सूजी का तीन गुना पानी (3 कप पानी) और नमक डाल दीजिये, सूजी डाल कर चमचे से चला दीजिये . जब सूजी के पानी में उबाल आने लगे , तब आप उसे चमचे से चलाते जाइये, घोल गाढ़ा होता जायेगा और थोड़ी ही देर में हलुवा जैसा लगने लगेगा. रवा उपमा को चमचे से चलाते हुये 3-4 मिनिट तक पकाइये, देशी घी डालकर मिला लीजिये.  स्वादिष्ट रवा उपमा तैयार है.

उपमा को प्याले में निकाल लीजिये और हरे धनियाँ तथा नारियल ऊपर से डालकर सजाइये. आज नास्ते में गरमा गरम उपमा, हरे धनिये की चटनी के साथ परोसिये और खाइये.
==========


'उपमा बनविण्यास जेवढा सोपा, त्याहीपेक्षा तो पचनासाठी अधिक चांगला' अशी उपम्याची ओळख झाली आहे. बनविण्याच्या विविध पध्दतींमुळे खमंग उपम्याने आपली 'एनी टाइम' ही प्रतिमा जपली आहे. नाशिमध्ये बहुतांश हॉटेल्समधील मेन्यूकार्डच्या ब्रेकफास्ट लीस्टमध्ये उपमा हे नाव अविभाज्य बनले आहे.

रात्रीच्या झोपेनंतर मेंदूतील ग्लुकोजच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी नाश्ता गरजेचा ठरतो, असं आहारतज्ज्ञ सांगतात. बहुतेकदा नाश्त्यामागील या शास्त्रीय दृष्टीकोनापेक्षाही आपण नाश्त्याच्या नावाखाली जीभेचे चोचले पुरव‌ितो, पण खरा नाश्ता कशाला म्हणावे, याचा प्रत्यय उपम्यासारख्या पदार्थांच्या समावेशातूनच येतो. महाराष्ट्रातल्या घराघरात स्थान मिळव‌िलेला रव्याचा उपमा दक्ष‌िणेतही तेवढाच लोकप्र‌िय आहे. दक्ष‌िण भारतीय पदार्थांच्या बरोबरीने उपम्याला मागणी असते. हलकाफुलका या शब्दाला समांतर ठरणारा उपमा बहुतेकदा चमचमीत मिसळ, पोहे अन् स्पायसी पदार्थांच्या तुलनेत स्थान पटकावून जातो. जास्त स्पायसी पदार्थांच्या तुलनेने या पदार्थात तेलाचा किंवा तुपाचा उपयोगही अत्यंत मर्याद‌ित प्रमाणात केला जातो, पण बरोबरीला विव‌िध पध्दतींनुसार कढीपत्ता, टोमॅटो, म‌िरची, मोहरीची फोडणी, उडीदाची दाळ, आलं अन् साखरेचा एकत्र‌ित वापर अशा फंड्यांमुळे हॉटेलगण‌िक उपम्याची चवही थोड्याफार फरकाने बदलते. त्यातबरोबर उपम्यात वाटाणा, शेंगदाणा, उडीदडाळ टाकली असेल तर तो खासच लागतो. उपम्यावर फरसाण अथवा किसलेला नारळ, चवीनुसार लिंबू टाकल्यास उपमा काय लागतो व्वा...!

वकीलवाडी अन् एमजीरोड परिसरातही काही हॉटेल्समध्ये चवदार, गरमागरम उपमा सर्व्ह केला जातो. यात सुखसागर रेस्टॉरंटमध्ये गरमागरम खुसखुशीत बनव‌िलेला उपमा खवळलेली भूक थांबवून धरतो. कढीपत्त्याचा स्वाद अन् सोबतच्या खोबऱ्याच्या चटणीमुळे जीभेवर या उपम्याचा स्वाद तरळत राहतो. याच परिसरात हॉटेल विनयमध्ये मिळणारा अन् भाताच्या मुदेच्या आकाराची उपम्याची ड‌िश नाश्त्यासाठी चांगला पर्याय ठरते. येथे गरमागरम उपम्यात कोवळ्या टोमॅटोचा स्वाद स्वादीष्टपणा वाढवून जातो. या उपम्यावर भुरभुरलेली बारीक शेव, त्यात परतून घातलेला लाल करपलेल्या रंगाचा कांदा अन् त्यावर पसरलेली ह‌िरवीगार कोथंबीर खव्वयांना भुरळ न घालणार तरच नवल. येथूनच थोडे पुढे आल्यानंतर एमजीरोडच्या मध्यावर साऊथ इंड‌ियनसह शाकाहारी पदार्थांसाठीचा चांगला पर्याय असणारे हॉटेल अन्नपूर्णा. या हॉटेलमध्येही गरमागरम उपमा नाश्त्याला बेस्ट ठरतो. कढीपत्त्याचा स्वाद अन् त्याच बरोबरीला त्यात घातलेली उडदाची दाळ जीभेला चांगला स्वाद देऊन जाते. या उपम्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी या स्वादाची रंगत वाढवूनच जाते. काही ठ‌िकाणी उम्यामध्ये आलं अन् साखरेचाही उपयोग करतात. आलं किसून उपम्यात घातले जाते. जीरे, मिरच्या, करपलेला कांदा, कढीपत्ता, टोमॅटो यांच्या जोडीला आलं अन् च‌िमुटभर साखरेचा स्वाद मिसळलेला उपमा जीभेची गेलेली चव परत आणतो. या विविध पध्दतींचा वेळोवेळी उपयोग करून घरात किचेनमध्ये केला जाणाऱ्या उपम्यातील चवही सातत्याने वेगळ्या रेस‌िपींच्या आधारे बदलती ठेवता येऊ शकते, याचाच प्रत्यय शहरातील विविध हॉटेल्स देतात. ट‌िळकपथवरील हॉटेल जगन्नाथ अन् सीबीएस परिसरातील हॉटेल पद्मा, जुन्या सीबीएस समोरील हॉटेल प्र‌िया येथेही हा उपमा जीभेवर स्वाद ठेवून जातो. श‌िवाय गोळे कॉलनीतील हॉटेल मनाली, कॉलेज रोड, गंगापूर रोड, शरणपूररोड परिसरातील व‌‌िव‌िध उडपी हॉटेल्सही उपम्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. या श‌िवाय डोक्यावरील पागोट्यावर जर्मलचे मोठे भांडे ठेवून सकाळी जोर जोराने हॉर्न वाजव‌ित शहरभर फ‌िरणाऱ्या काही दाक्ष‌िणात्य लोकांकडेही इडली, वड्यांसह उपमाही उपलब्ध असतो. त्यांच्या उपम्याची टेस्टही अनोखा स्वाद जीभेवर ठेवून जाते. याश‌िवाय रव‌िवार कारंजा, अशोक स्तंभ अशा विविध गजबजलेल्या ठ‌िकाणीही नाश्त्याच्या इस्टंट स्टॉलवरही उपमा भुरळ पाडतो.

असा बनवा उपमा

एक वाटी रवा, बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे,

मोहरी, एक ग्लास पाणी, एक चमचा तूप, आवश्यकतेनुसार तेल, बारीक शेव,

चिमुटभर साखर, चवीनुसार मीठ, बारीक च‌रलेल्या हिरव्या मिरच्या, ह‌िरवी कोथिंबीर.

कृती-

कढईत तूप गरम करून त्यावर रवा भाजून घ्या. दुसऱ्या आता वेगळ्या कढईत तेल गरम करून जीरे, मोहरी, कांदा, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ व साखर टाकून परतवून घ्या. त्यात योग्य प्रमाणात पाणी टाकून उकळी येऊ द्या. त्यात भाजलेला रवा टाकून चमच्याने एकजीव करा. झाकण ठेवून थोडावेळ शिजवा. रवा फुलून आल्यांनंतर गॅस बंद करा. ड‌िशमध्ये उपमा काढून कोथ‌िंबीर, बारीक शेव, खोबऱ्याचा किस टाकून सजावट करा. उपम्याची ही गरमा गरम ड‌िश खवय्यांच्या मनावर भुरळ टाकेल. 
===========



rava upma recipe in marathi language

sevai upma recipe in marathi

upma recipe in marathi video

upma recipe marathi style

upma recipe in hindi

recipe of upma by sanjeev kapoor

bread upma recipe

kande pohe recipe in marathi

उपमा बनाने की विधि

उपमा अलंकार

उपमा की विधि

उपमा कैसे बनाये

उपमा रेसिपी

उपमा मराठी

उपमा रेसेपी

Saturday, May 14, 2016

3:51 PM

Ayurvedic way to lose weight safely




Sneha Verma, a 24-year-old who has benefited from Razorslim, says, “I was trying hard to shed those extra kilos but nothing worked. I would skip meals, drink shakes and sweat for hours in the gym, but I was unable to control my appetite. Razorslim helped me control my hunger, made me more active and today , I weigh 15 kilos less, and that too without exercises and diet plans.“100 PER CENT NATURAL
The product is a 100 per cent natural scientific Ayurvedic preparation that flushes away unwanted fat without any side effects. It's the six-month treatment that triggers inch loss from day one by softening the hard fat and then slowly adopting the body to shed significant weight. Regular follow-up calls from doctors help keep the client's weight loss journey smooth.
SCIENTIFICALLY CHOSEN HERBS THAT HELP IN REDUCING INCHES
Shed inches: The product contains yograj guggal which removes toxins from the system and quickly melts inches off the waist, hips and thighs. It removes those toxins which have a role in fat development around organs. Guggal stimulates the fat metabolism and promotes lean body mass and weight loss.
Boost metabolism: It also con tains garcinia cambogia which helps in weight loss by converting food into energy, boosting metabolism and developing muscles. Garcinia contains hydroxyl citric acid, which stops the conversion of sugar into fat and adds to fat loss, which helps in mitigating unnecessary hunger.
Lose weight: The product also contains lahasunadi vati and bidang, which help in improving the digestive system so that the fat in the body is digested well.
There are two types of capsules -No1 capsules, which help in removing fat from different parts of the body , and no2 capsules which help in evacuating the loosened fat through the excretory system.
A TRUSTED SOLUTION
Ayurveda, the Indian sy stem of medicine, has been used to treat overweight body condition for thou sands of years with no remarkable side-effects. This treatment follows the healthy use of drug, diet and a healthy lifestyle. This treatment has been trusted since an cient times for best results because Ayurvedic me dicinal preparations are made using single or complex mixtures, based on scientifically chosen plant and mineral products.
This makes the treatment 100 per cent safe.
DOCTORS' THOUGHTS
Dr MP Sharma, MD, Ayurveda, says, “In the past ten years, this formula has done wonders for my patients. It not only reduces fat, but also improves the fatty liver conditions.“
Dr Anurag Gupta, BAMS, MS, says, “I have been prescribing this formula for the last five years, and the results have been wonderful. It reduces weight without any side-effects.“
Dr Rekha Rathi, BAMS, adds, “This is the most effective solution for all fat-related problems. It reduces bad cholesterol and increases metabolism really fast.“
*Results may vary person to person depending on diet and lifestyle.*Pregnant woman and lactating mothers should take it only after consulting their doctors.Cash on delivery, free shipment and free telephonic consultation with their expert doctors available. Pay online and avail an extra 10% discount To order, call toll free no: 1800-270-1103; or order online at: http:www.razorbill.co.in Mail for your order at: info@razorbill.co.in Disclaimer: The viewssuggestionsopinions expressed in the article are the sole responsibility of the experts.










3:48 PM

Tuck into delicious Oriental delights




Turning one this month is popular eatery Wok Express. Regular takeaway is passé. You can now create your own customisable option of woks by first choosing your own base (steamed rice, wheat ramen soba noodles or skip the base), then choosing t your favourite fresh vegetables T or meats and lastly , add scrumpf tious sauces that range from trah ditional Teriyaki, zestful Kung Pao, Chilly Basil, Massaman curry or Black Bean. There is also a wide range of accompaniments like dim-sums, sushis, bao's and bubble teas at Wok Express -one of the most fastest, freshest, convenient and affordable quick service restaurants in the city. It is inspired by Wok to Walk, a restaurant in New York that allows customers to make their own Asian recipes. Within a year of its presence, Wok Express has successfully opened five outlets in the city , serving around 1,25,000 woks with approximately 50,000 delighted patron walk-ins a month. It plans to open 20 more outlets in Mumbai by 2017, starting with one outlet in Malad and the other one in Andheri on May 18.
On the onset of completing an eventful year, the chain has introduced new irresistible additions to its menu across all existing and new outlets with Fiery Chilly Paneer and Fluffy Chicken Baos. And to cool you down in the summer heat, their two new flavours of Bubble Tea comprise refreshing flavours of mango with a hint of basil and iced chai. The team promises to teach you how to `roll' with an uber soft and flavoursome ninja prawn and add a modern twist to your sushi with Jalapeno Cream Cheese.
Where: Wok Express outlets at Churchgate, Kemps Corner , Pali Naka, Lokhandwala and BKC.
Call: +919833380808.
http://www.wokexpress.in